Wednesday 28 December 2011

आण्णांच्या आंदोलनाची दशा आणी दिशा ?

.
गेल्या वर्षभरा पासुन अण्णाचे जनलोकपाल विधयका साठी अंदोलन सुरु होते सुरवातीला मी हि या अंदोलनात सक्रीय सहभाग नोंदवला कारण एकच भ्रष्ट्राचारा विषयी मनात असलेली चिड आणि एका मराठी माणसाच्या अंदोलनाला देशभरातुन ऐवढा प्रचंड पांढीबा मिळत आसतांना आपण शांत का? या नंतर जन लोकपालची पुर्ण माहिती घेतली आणी त्याच वेळी खात्री झाली की सरकार जनलोकपाल संसदेत सहजा सहज मांडनार नाही. त्यानंतर 16 आँगस्ट च्या अदोलनाला मिळालेला पांढीबा आणि सरकारची झालेली कोंडी पाहता खरच या देशातली सगळीच जनता भ्रष्ट्राचाराला वैतागली आहे.आणि जनतेला काँग्रेस सरकारला जो संदेश पोचवायचा होता तो अण्णाच्या मार्फत जनतेने अतिशय योग्य पध्दतीने पोचवला होता. आणि त्याचा धसका सरकारने चांगलाच घेतला, त्या नंतर शहा कटशाहचं राजकारण सुरु झाले टिम आण्णाच(फक्त अण्णा सोडुन) च्या अंगातले काही सुप्त गुण एक एक करुन जनते समोर येवु लागले .अर्थात आँगस्ट मधील अंदोलन विजयाची हवा टिम अण्णाच्या डोक्यात घुसत चालल्याची शंका मनात येवु लागली. जी गोष्ट नको होती तीच गोष्ट प्रकर्षाने जाणवु लागली, मग या मध्ये केजरवाल किरण बेदी वर झालेले भ्रष्ट्राचाराचे आरोपांवर टिम अण्णांनी दिलेली प्रतिक्रीया किंवा प्रशांत भुषन चे काश्मिर विषयी बेताल वक्तव्य असो किंवा अण्णाच्या ब्लांग वरुन राजु परुळेकरशी झालेला वाद आसो किंवा शरद पवारान वर झालेल्या हल्ल्याचे अनावधाने आण्णा कडुन झालेले सर्मथन आसो, प्रसिध्दी माध्यमांना दिलेले अवास्तव महत्व आसो, दुर्देवाने या सगळ्या घटना काँग्रेस ला फायदा देनार्या ठरल्या यात शंका नाही.
.
जनलोकपालच्या अंदोलना लोकाबरोबरच प्रसिध्दि खुप मोलाचा वाटा आहे हे टाळुन जमनार नाही त्यांनी या अदोलनाला ग्लोबल बनवल पण ग्रामीन भागातल्या जनते पर्यत पोचन त्यांना शक्य झाल नाही हे ही तेवढच सत्य आहे. त्यांनतर पुन्हा आण्णानी जंतर मंतर वर एक दिवसाच्या लक्षणिय उपोषन केले आणि तेव्हाच भाजप आणि इतर राजकिय पक्षानी या कायद्याला जाहिर पांढीबा दिला आणि आंदोलनाच्या वाढत्या दबावा पुढे झुकुन काँग्रेस सरकारने जन लोकपाल काहि अंशी संमातर लोकपाल नावाचा अतिशय घाईत काल परवाच संसदेत चर्चे साठी आनला आणि याच वेळी अण्णानी पुन्हा जन लोकपाल मागणी साठी मुंबईत उपोषनाला बसले आर्थात घटनाक्रम सांगन्याचा उद्देश येवढाच की एखादी चळवळ जेव्हा सुरु होते तेंव्हा तिच्या कडे पाहण्याचा लोकमानसाचा दृष्टीकोण वेगळा असतो ,पण ती चळवळ जेव्हा मध्यावर पोचते तेव्हा तिच्यातल्या गुण आणि दोषाचे जाणिव लोकमानसाला होते, आणि याच लोकमानसाची सुरवाती येवढीच अपुलकी चळवळी शेवटा पर्यत पोचलीच तर ती चळवळ यशस्वी होते अस माझ स्पष्ट मत आहे. जनलोकपाल संसदेत जरुर आला आसता अण्णांनी उतावळे पणा न करता थोडी संयमी भुमिका घेणे अवश्यक होते.ती आण्णानी घेतली नाही आणि सर्वात महत्वाची बाब म्हणजे नेता कमी आणि आनुयायी जास्त बोलायला लागले तर लोंकांची आंदोलना वरची निष्ठा कमी होते. आणि ह्याच गोष्टी भान टिम आण्णांना उरलं नाही.
.
या नंतर संसदेत जी चर्चा झाली खरोखर ती खुप गंभिर होती राजकारण म्हणजे बेआक्कल आणि बेजबाबदार हा जो सर्वसामान्या मध्ये न्युगंड निर्माण झाला होता त्याला काही अंशी छेद देनारी भाषणे या निमित्ताने ऐकाला मिळाली. तर आसो सरकारणे आणलेले लोकपाल बिल भारताच्या सर्वोच्या संसदेने मंजुर केले, काही आसो पण आण्णाच्या आंदोलना मुळे संसदेत लोकपाल कायदा मंजुर झाला याच सर्व श्रेय आण्णान द्यावे लागेल यात तिळमात्र शंका नाही. आण्णा तुमचं आंदोलन आगदी योग्य दिशेला सुरु होत भले मध्ये मध्ये थोड भरकटतं असो आता तर तुम्ही काँग्रेस विरुध्द दोन हात करन्याची घोषना केली आहे . खरोखर ती प्रशंसनीय आहे समोरचा जेव्हा लढायला आपल्या मैदाना येत नाही त्या वेळी नक्कीच आल्याला त्याच्या मैदानात जावे लागते. आणी तुम्ही आता राजकीय मैदानात काँग्रेशी दोन हात करनार आहात यात आम्हाला अंनंदच आहे, तुम्हाला जनलोकपाल अंदोलनात आलेले यश जरी कमी वाटतं आसले तरी आमच्या दृष्ट्रीने खुप आहे निदान भ्रष्ट्राचारा विरोधात सरकारी पातळी वर सुरुवात तरी झाली. फक्त एकच विंनंती आहे विजयाचा हवा डोक्यात जावु देवु नका आणी प्रसिध्दि माध्यमांनवर आजिबात विश्वास ठेवु नका, लक्ष्यात ठेवा पाडन्या साठीच हे तुम्हाला डोक्यावर घेतात.. आता पर्यत ज्या हिंम्मतीने लढलात तसेच कायम लढत राहा देशातली जनता नक्कीच तुमच्या सोबत आहे.


प्रशांत गडगे

Wednesday 21 December 2011

"भारतरत्न" कोणासाठी ??

भारतरत्न म्हणजे देशातील सर्वोच्च नागरी सन्मान गेली आता हा सन्मान देशाने कोणाला द्यावा की देवु नये ऐवढे सांगन्या इतपत तरी मी मोठा नाही. पण गेल्या काही वर्षा पासुन सचिन तेंडुकरला क्रिडाक्षेत्रातील भक्कम कामगिरी बद्दल हा सन्मान द्यावा हि मागनी जोर धरीत होती पण क्रिडाक्षेत्रातील कामगीरी बाबत कोणती तरतुद या सन्मानाच्या नियमावलीत नसल्या कारणाने हा विषय लांबनीवर पडला होता पण आता या सन्मानाच्या नियामावलीत तशी तरतुद करुन क्रिडाक्षेत्रातील आणि चित्रपट भक्कम कामगिरी करनार्या खेळाडुना आताभारतरत्न किताब बहाल करता येनार आहे पण मुळ हा मुद्दा की खेळ हे मनोरंजनाचे साधन आहे. पैसा आणि प्रसिध्दी या दोन्ही लयलुट करुन जर भारतरत्न किताब कुणाला मिळत आसेल तर मला मात्र हरकत आहे.
.
खेळांना अताच्या युगात चांगलेच सुगीचे दिवस आले आहेत, कारण म्हणजे ग्लोबलनायझेशन आणि काँरपोरेट यंगीस्थान पीढी प्रत्यक्ष मैदानावर खेळन्या पेक्षा खेळ पाहन्यालाच महत्वदेते, त्यात खेळाचे नवीन नवीन ट्रेंन्ड बाजारात आल्याने खेळ सध्या भलत्याच उंचीवर पोचले आहेत. त्यात राष्ट्रकुल चे कलमाडी, पवार साहेब, दालमिया, ही नावे आपल्या चांगल्याच परीचयाची आहेत तर आसो. मुळ विषयाच कडे वळतो भारतरत्न हा भारताचा सर्वाच्च नागरी सन्मान आहे आणि अत्तापर्यत तो 41 जनांना आदरपुर्वक बहाल करण्यात आला आहे. त्यात साउथ आफ्रिकेचे नेँल्सन मंडेलांचा समावेश आहे. हा सन्मान प्रप्त करण्यार्या मध्ये,
1 धोंडे केशव कर्वे
2 पांडुरंग वामन काळे
3 लाल बहादुर शारत्री
4 डाँ भिमराव अंबेडकर
5 विनोबा भावे
6 जयप्रकाश नारायन
7 मदर तेरेसा
8 अब्दुल कलाम
9 लता मंगेशकर
10 भिमसेन जोशी
.
आशा आनेक गुणी आणि समाजासाठी दिवसरात्र झटनार्या, किंबहुना आपले संपुर्ण जीवनच समाजासाठी अर्पण करनार्या या असामान्य व्यक्ती, मध्ये जर क्रिडा आणि चित्रपट या दोन क्षेत्राचा समावेश झाला तर या यादी मध्ये कुठ कुठली नावे झळकतील हे सुज्ञास न सांगितलेलेच बरे आसो या 41व्यक्तीचे कर्तुत्व त्यांच्या नावावरुनच कळते ऐवढे ते महान होते आणिआहेत ही. त्यांची समाजाविषयी आसलेली तळमळ आणि त्याग पाहुनच, भारतातल्या जनतेने त्यांना हा सर्वोच्य सन्मान त्यांना कृतघ्नपणे बहाल केला. आज दुर्देवाने नियमावलीत बदल करुन
क्रिडा आणि चित्रपट या दोन क्षेत्रांचा समावेश करन्याचा विचार सरकार करीत आहे. या वरुन आपली नितीमत्ता किती खाली येत आहे याच दर्शन जगाला आणी आपल्या पुढच्या पिढीला आपन दाखवत आहोत.
.
क्रिडा आणी चित्रपट यांच्या पार्ट्याचे रंगीत वर्णन आपण पेज 3 वर वाचतोच आहेत. क्रिडाक्षेत्रातील आसो किंवा, चित्रपट क्षेत्रातील आसो, जे काम ते देशासाठी करतात त्याचा त्यांना मोबदला हि दिला जातो, आणि प्रसिद्दी ही... आता सचिन च घ्याना काय कमी आहे सचिन कडे क्रिडा क्षेत्रात त्याची कामगीरी माहानच आहेपण सामाजिक कामगीरीच काय ? उद्या अमिताब भारतरत्न मागेल ? परवा बिपाशा,सौफ आली च नाव कोणी तरी सुचवेल तुम्हाला आम्हाला हे पटनार आहे का ? आर्थात नाही मग सरकार का या उठाठेव करतय कळत हेच कळत नाही.
भारतरत्न किताबाचे पावित्र्य खुप मोठे आहे एका चुकीच्या व्यक्तीच्या समावेशा मुळे या सगळ्या मोठ्या असामीचा आपमान होवु शकतो, त्यामुळे सरकारने ही उठाठेव न केलेलीच बरी ? देशातील विकासकामांकडेच लक्ष द्यावे आणि फक्त सामाजकल्याना साठी आणि देशहित आणि देशाच्या सेवेसाठी( कोणत्याही प्रकारचा मलिदा न खाता)संपुर्ण आयुष्य वेचनार्यानाच हा किताब द्यावा तरच "भारतरत्न" खर्या अर्थाने भारतरत्न राहिल अन्याथा त्याला मातीमोल व्हायला वेळ लागनार नाही.

प्रशांत गडगे .

Saturday 10 December 2011

हा कसला गांधीवाद ??

भारत हा महात्मा गांधी चा देश आहे, मी तर मुळीच हे मानत नाही पण बहुसंख्य गांधीवादी असे म्हणतात, महात्मा गांधी या देशात जन्मले आणि याच देशात बंदुकीच्या गोळ्या खावुन मेले देशप्रेमा साठी किंवा देशहिता साठी तर मुळीच नाही असे मला वाटते अजुन आठ दहा वर्ष जगलेच आसते तर आजुन कोणते दिवे लावले आसते हे त्यांच त्यांनाच ठावुक ,जगातील कुठे नाही पण भारतात त्यांच्या गांधी वादाचा नामजप हा सगळ्याच जास्त प्रमाणात होतो हे हि तेवढच खंर, आसो, या देशात गांधी मुळे गांधीवादाला एक वलय प्राप्त झालय, इथल्या सरकारी कचेरी पासुन तर चलनी नोटे पर्यत गांधीची छबी दिसते, पण त्याच बरोबर जगात गांधीची सर्वाधीक बदनामी विंटबना कुठे होत आसेल तर या देशात का ? इथे आज ज्या काही घटना घडत आहेत त्या गांधीवादात बसतात का ? याच थोडा विचार करा ना ? सत्य, न्याय, आहिंसा, मानवता, हि तत्व देशात गांधीवादी पाळतात का ? गांधीच्या काँग्रेस पक्षा कडुन तरी हि तत्व पाळली जातात?
राज्यकर्तानीच हि तत्व अक्षरशा पायदळी तुडवली त्याची किती उदाहरने देता येतील भ्रष्ट्राचार करणे, मतदारांना लाच देने, आंदोलन मोडुन काढने. हि तत्व गांधीवादात बसतात का ? 1लाख 76 कोटी रु . महा घोटाळा भारतात झाला, कोणाच्या कृपेने ? एकीकडे जनतेची प्रंचड लूट कारायची आणि दुसरी कडे त्याच जनतेसमोर मतांची भिक मागायची हा कुठला आला गांधीवाद !! गल्ली पासुन दिल्ली पर्यत सगळेच राजकारनी आणि राजकर्ते गांधीच्या नावाचा जय घोष करतात आणि एकीकडे लाचारी,लबाडी भ्रष्ट्राचार कृतघ्नता पाखंड याला उधान आसा उलटाच प्रवास गांधीवाद्याचा पाहायला मिळतो. सत्तेसाठी जनतेशी प्रातरणा हि तर रक्तातच आहे यांच्या, म्हणतात की राजकारनात आणी सत्तकारणात ला गांधीवाद लालबहादुर शास्री निधनानंतर संपला आणि ते खरेच आहे. कुठे ते आणी कुठे आजचे मंत्री...
हिदुस्थानात आज गांधीवाद कमी आणि त्याची मार्केटिंग जास्त सुरु हे गांधीशी काडीचा संबध नसलेला गावगुंड मुन्नाभाई आज गांधी टोपी घालून आज पंचायत निवडुकीत ऐटीत मते मागतो आहे तर कोणी गांधीटोपी घालुनच लाच घेतो आहे. किती भिषन घडतय हे. तो महात्मा बघत आसेल हे तर त्याच्या अत्म्याला किती वेदना होत आसतील हे देवच जानो....
गांधीवादा सारख्या विषयावर लिहिन्याची मुळीच हौस नव्हती पण आत्तच आण्णा हजारे यांच्या गांधीवादावर आक्षेप घेवुन गांधीवादी विचारांची जो अर्थ सांगीतला जातो तो या राजकारण्या आणी काँग्रेसवाल्यांकडुन पाळला जातोय का याचा विचार करायची वेळ आज आपल्या सगळ्यावर आली आहे. गांधीवाद फक्त तोँडात पोटात काही वेगळच आशी आजची परीस्थिती आहे साठ वर्ष फक्त फसणुक केली या गांधीवाद आणि काँग्रेसनी विकास काय शुन्य ?? देशात आत्यचार बलात्कार भष्ट्राचार गुन्हेगारी वाढतेय हे का थांबु शकत नाही गांधीवाद, निवडनुकी वेळी फक्त गांधीवाद आणि इतर वेळी कुठे जातो तुमचा हा गांधीवाद !!
आज देश कुठे चाललाय आण्णा सारखा चारित्र्यवान माणुस याच एक शब्द चुकीचा काय बोलला तर तो गांधीवादाच्या विरोधी किती दिवस झाले तो आहिंसेने सत्या साठी लोकपालची मागणी करतो त्याला गांधीवादाने उत्तर द्यायच सोडुन खोटी आश्वासने देता हाच गांधीच्या काँग्रेस चा गांधीवाद का ? गांधीवाद आम्हाला कधीच पटला नाही आणि पटनार देखील नाही त्याच विरोधच करु पण गांधीवाद्या कडुन गांधीवादाची जी विटंबना चाललेल ती पाहुन हसु ही अवरत नाही. असा गांधीवाद तुम्हालाच लखलाभो, गांधीवादाच सोंग घेवुन जनतेची बरीच फसवनुक तुम्ही केली पण आशा आहे जनता आता शहानी झाली असेल, तुमच्या ह्या सोँगाचा पडदा टरा टरा फाडुन वेशीवर टांगन्याच्या संधी वाट पाहत आहे, हे सगळं पाहतांना मनात सारखा एकच प्रश्न येतो "हा कसला गांधीवाद" ??

प्रशांत गडगे

Wednesday 7 December 2011

मुंबई सह संयुक्त महाराष्ट्र व्हाया आजची तरुणाई....

कालच आचार्य आत्रे रंगमदिरात गिरगाव व्हाया दादर नाटकाचा प्रयोग पाहिला, तसा संयुक्त महाराष्ट्राचा इतिहास वाचलाच आहे, पण वेळ होता अन् योगायोगानेच या नाटकाचा प्रयोग हि त्या मुळे हे शक्य झाल, एका सत्य घटनेवर आधारीत आणि वास्तवाशी संबध आसलेल्या या नाटकाला तशी तुरळकच गर्दी होती, आणि कोणताही धांगडधिंगा न करता शांततेत नाटक पाहत होती..
या नाटकाची संहिता तशी साधीच पण खुप काही सांगुन जानारी काल परवाच हि घटना घडुन गेली की, काय ? आशी जाणीव करुन देनारी.. अर्थात आज पन्नास वर्ष उलटली तरी जखम ही आजुन ओलीच आहे फक्त थोडी खपली धरली आहे. 105 हुत्म्याच्या बलिदाना नंतर मुंबई सह संयुक्त महाराष्ट्राची निर्मिती झाली, आचार्य आत्रे, एस् एम जोशी काँ डांगे आणि अनेकाच्या नेऋत्वाने सतत पाच वर्ष मोरारजी देसाई आणि नेहरु सारख्या लोकांशी संघर्ष करुन मिळवली आहे हि मुंबई...

नाटकाच्या शेवटच्या दृष्यात खुप भयान आणि वास्तवातला एक प्रसंग चितारला आहे मन हेलावनारा आणि डोळ्यात अश्रु येता येता एक सामाजिक बांधिलकीची जाण करुन देनारा. संयुक्त महाराष्ट्राच्या अंदोलनात हुतात्मा झालेल्याची एक विधवा फ्लोराफांऊट जवळ चळवळीच इतिहास आठवत आसते मध्येच एक 14 वर्षाचा मुलगा तिच्या कडे विस्मयाने बघुन तिचा तिरस्कार करुन निघुन जातो. प्रसंग संपतो...

पण प्रत्येक रसिकाला अंर्तमुख करुन जातो..

जी मुंबई महाराष्ट्रात आनन्या साठी ज्या ज्ञात अज्ञात हुतात्म्या नी आपल्या संसाराची राख रांगोळी केली, लाठ्या खाल्या काठ्या खाल्या वेळ आली तेव्हा बलिदान केले त्या हुतात्म्या बद्दल आजच्या या तरूणपीढी ला काहीच माहीती आज शंभर पैकी जेमतेम फक्त 20 तरुणांना या मुबई सह संयुक्त महाराष्ट्राची चळवळ माहीत आहे. कीती लज्जास्पद आहे... कारण हा इतिहास कधीच या पिढीला शिकवला गेला नाही सांगीतला गेला नाही.आजही मुंबईला बाँम्बे म्हणुन संबोधनारे कीती मराठी महाभाग मी याच महाराष्ट्रात पाहीले आहेत हेच याच एक ज्वलंत उदाहरण,जसा भारताच्या स्वंतंत्र्य लढ्याचा इतिहास आहे तसाच दुर्देवाने मराठी माणसाला महाराष्ट्रा सहित मुंबई , आम्हाला या दळभद्री कांग्रेस विरुध्द संघर्ष करुन घ्यावी लागली आहे. हा ही एक इतिहास आहे.. हा इतिहास आजच्या तरुणपीढी पर्यत पोचायलाच हवा कारण भविष्यात पुन्हा आसे कुटील डाव होनारच , आणि वेळी रक्तरंजीत इतिहास या पिढीला माहीतच नसेल तर आमची हि मुंबई हातची गेली म्हणुन समजा. हा इतिहास हस्तांतरीत करण्याचे काम आपल्या सगळ्यांच आहे, प्रत्येक मराठी मानसाला आभिमानाने जर मुंबईत राहायचं आसेल तर संयुक्त महाराष्ट्राची चळवळ प्रत्येक मराठी घरात घरात पोचलीच पाहीजे, जर हा इतिहास पोचलाच नाही आणी उद्या जर यदा कदाचीत मुंबई महाराष्ट्रतुन वेगळी झालीच तर आपल्या कर्माला दोष देत बसु नका !

मुंबई सह संयुक्त महाराष्ट्राचा लढा प्रत्येक मराठी तरुणा पर्यत पोहचलाच पाहीजेत यासाठी, भविष्यात मुंबई वेगळी करन्याचा प्रयत्न कोणी केलाच तर पुन्हा या क्रांती च्या मशाली सत्ताधार्याच्या घश्यात घालन्या साठी या पिढीला आत्ताच जागे केले पाहीजेत..
.
प्रशांत गडगे

लोकल ते ग्लोबल दहिहंडी..

लहानपणी साजरे केलेले सनवार आता आठवले की मला मोठी गंमतच वाटते. त्यावेळी शाळेचा अभ्यास तसा थोडाच कमीच आसायचा आणि हल्लीच्या ट्युशनच तेव्हा फँड ...