Friday 24 February 2012

अर्थकारणात फसलेले राजकारन ...

राज्यातला दाहा मोठ्या महानगरपालिकाच्या निवडनुका आत्ताच पार पडल्या कोणाला घवघवीत यश आल तर कोणाची झोळी पराभवाने भरुन गेली, एक दिवसाचा मतदार राजा पुन्हा एकदा पाच वर्षासाठी भिकारी झाला, कोण किती आश्वासने पाळतोय हे येत्या पाच वर्षात कळेलच तुर्तास विकासाची गंगा अंगणात येई पर्यत तरी मतदार राजाला वाट पाहन्या शिवाय गंत्यतर नाही. आसो निवडनूका झाल्या आहेत निदान 50% मतदारांनी आपला कौल देवुन लोकशाही पुर्ण नाही पण आर्धी तरी बळकट करन्यास थोडा हातभार तरी लावला आहे. आता निवडुन आलेल्याच सगळ्याच उमेदवांरनी ठरवायच आहे की ही लोकशाही अजुन बळकट करायची की खिळखीळी.

या निवडनुकीत प्रचाराच उडालेला प्रंचंड धुराळा गल्ली पासुन शहराच्या मुख्य रस्त्यावर पोचला आरोपांच्या प्रत्यारोपाच्या फैरी नी महाराष्ट्राच दणानुन गेला. बाळा साहेब, राज ठाकरे, आजित पवार पृथ्वीराज चव्हान सगळ्याच नेत्यांनी सर्वस्व पणाला लावून विजयश्री खेचुन आनन्याचा प्रयत्न केला पण प्रत्येकाला कुठे पराजय मिळाला तर कुठे जय. मुंबई ठाण्यात युतीला पुन्हा एकदा यश आलं तर नाशिक मध्ये मनसे वचक कायम राहीला. राष्ट्रवादीने ही पुणे पिपरी चिंचवड आपल्या कडे शाबुत ठेवुन कमाल केली इतर ठिकाणी काँग्रेसनी आपली लायकी थोडी फार संभाळुन ठेवली. आसो.. तुम्ही आम्ही सामान्य माणसं मत देण्या पलिकडे आपण काय करु शकतो? पण या निवडनुकीत एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली तीची सल मनात सलत होती आणि म्हणुनच तुमच्याशी हा संवाद साधतोय, निवडनुक संपल्या का मग शिमगा सुरु होतो. जय पराभवाचे विश्लेषन सगळ्याच नाक्या नाक्यावर होतांना दिसतयं पण मला कोणाच्या जय पराजयची चर्चा करायची नाही. मला थेट बोलायचं आहे ते निवडनुकीत वापरल्या जानार्या पैशाबद्दल, होय मतदाराना पैशाचे अमिष दाखवुन मते खरेदी केली जातात. त्या बद्दल वर वर साधा वाटनारा हा प्रश्न प्रत्येक निवडनुकीत गंभिर होत चालला आहे.

एक काळ आसा होता लोक समाजकारण करण्या साठी राजकारणात येत होती आणि आजच्या काळात लोक स्वःताचे अर्थकारन सुधारन्या साठी राजकारनात येतात. आशी किती उदाःने आपल्या समोर आहेत एकेकाळी रस्त्यावर भाजी विकनारा आमदार करोडपती होतो इतकचं काय हो माझ्याच मतदार संघातल्या आमदारच घ्या ना ? जेमतेम कुंटुबात वाढलेला हा आमदार तिन वेळा निवडुन आला आहे आणी मागच्या निवडनुकित त्याची प्रोपर्टी होती 5 करोड, आता काय म्हणाल याला ? आख्ख अयुष्य खर्ची घालुन पण आपण एक करोड रु . बचत नाही करु शकत नाही ती फक्त 15 वर्षाच्या अमदारकीत शक्य आहे . खासदार मंत्री याची दुप्पट तिप्पट आसेल यात वादच नाही. हाच पैसा पुन्हा निवडनुकीत पेरला जातो आणि पुन्हा पाच वर्षात त्याच पिक घ्यायला नेते मंडळी तयारच आसते. या निवडनुकीच्या काळात पैश्याचे नीच राजकारण फार जवळुन बघायचा योग आला, आणि समाजकारण राजकारणा पासुन पुर्ण विभक्त झाल्याच दुर्देवी चित्र पाहायला मिळाल.. काही आपवाद वगळता सर्व सामान्य माणूस आता नगरसेवक आमदार खारसदार कधीच बनु शकनार नाही याची प्रर्कर्षाने जाणिव झाली. आणि तुम्ही सामजिक क्षेत्रात तळमळीने काम करुनही ही मतदार तुम्हाला मत देतीलच याची शाश्वती नाही. नुसते होर्डिग्स् स्टिकर आव्हँड्टाइज, प्रवास कार्यकर्त्याचा खर्च एका साध्या निवडनुकीचे बजेट काही लाखाच्या घरात आसतो आणि नोटा देवुन मत विकत घ्यायचे आकडे काही निराळेच. आता तुम्हीच सांगा तुम्हाला अम्हाला किवां कोणत्याही सर्वसामान्य कार्यकर्त्याला हा ऐवढा खर्च झेपनार आहे का ?? दुसरी गोष्ट जानवली ती म्हणजे आशिक्षितांन बरोबरच सुशिक्षित मतदार ही पैश्याच्या अमिशाला बळी पडायला लागले आणी देशातल्या लोकशाही वेगळ्याच मार्गावर भरकटत चालल्याची चिंता आधिकच वाढली. आज पर्यत वाटत होत गरीब आशिक्षित पैशाची लाचारी साठी मत देत होती पण सुक्षितांच काय ? शिक्षनाचा प्रसार झाला तर देश सुधारेल आस वाटतं होत पण दुर्देवाने देशाला खड्ड्यात टाकनारे कोण आहेत सगळे सुशिक्षितच ना ? गरीब बिच्चार दोन वेळच्या आन्नाच्या आशेने जगतोय आणि सुशिक्षित आपल्या श्रिंमती साठी धडपतोय आणि त्यातच या राजकारन्यांच फावतयं, हे जे सगळे प्रकार चालले आहेत ते देशाला विनाशा कडे नेत आहे. ज्यांना समाजाविषयी प्रेम आहे सामाजिक कामाची आवड आहे ज्यांना उद्याच नेऋत्व करायचे आहे आस नेऋत्व उदयाला येन्या पुर्वीत पैश्याच्या जोरावर उखडुन फेकुन दिल जातयं आणि चुकीची माणसं एकदा काय राजकारनात गेली की तिथल्या दहा चांगल्या माणसांना ते चुकीची मार्गावर आनतात आणि खाल पासुन वर पर्यत ज्या चुका होतात त्याला सर्वस्वी जबादार आसतो तो सर्वसामान्य ! आणि त्याची फळ भोगतो तो आपला देश.
या सगळ्याच परिस्थितीत समोर आसतांना आसेच अनुभव तुम्हाला ही आले आसतीलच ? कसा मार्ग काढता येईल यातुन ? पुढे काय होईल या देशाच ? आश्या अनेक प्रश्नांनी पुरता गोंधळुन गेलोय मी ! तुम्हाला सुचतात का या प्रश्नांची उत्तरे ? सुचली तर नक्की कळवा !!

Thursday 9 February 2012

लोकशाही आणी मतदान !!

या लोकशाही आपल्याला दिलेल्या मुलभुत हक्का पैकी मतदानाचा हक्क महत्वाचा आहे. पण गेल्या काही वर्षापासुन होनार्या निडनुकीच्या मतदानाची घटती टक्केवारी हा चिंतेचा विषय झाला आहे. एकविसाव्या शतकात भारत जागतिक महासत्ता होन्याची स्वप्न बघतोय देशात साक्षरतेचे प्रमाण ही झपाट्याने वाढत आहे पण निवडनुक प्रक्रीयेत मतदानाला मिळनारा आल्प प्रतिसाद हाच या देश्याच्या अधोगतीस कारणीभुत ठरु शकतो कारण की देशाची 50% जनता फक्त मतदान करते. आणि या प्रक्रीयेतुन निवडुन आलेले लोकप्रतिनिधी 100% जनतेवर राज्य करतात या मुळेच या देशात आनेक समस्या निर्मान झाल्या आहेत किबहुना लोकशाहीस हे मारक आहे. हे चित्र बदलायच आसेल तर मतदान प्रत्येकाला सक्तीचे केले पाहीजेत आसे मला वाटते पण आसो जागतिकरनाने ग्लोबल झालेलो आम्ही मतदानाच्या दिवशी फक्त एक सुट्टी म्हणून आरामात साजरी करन्या पलीकडे काय करतो ? अत्ताच कर्नाकट विधान सभेत मंत्र्याचे आश्लिल व्हीडीओ प्रकरन पहील्यावर या त्याची पुर्ण आनुभुती येते या देशाच भल करायच आसेल तर मतदान करने सक्तीचे झालेच पाहीजेत. अन्यथा लोकशाही डोलारा कोसळायला वेळ लागनार नाही.

.

१. मतदान हे लोकशाहीतील पवित्र कर्तव्य आहे. हक्कही आहे. कोणत्याही कारणास्तव मतदानाबाबत उदासीन राहू नका. आपला हक्क बजावा, कर्तव्य पार पाडा. स्वतः मतदान करा आणि इतरांनाही मतदानास प्रवृत्त करा.

२. मतदानाचा हक्क वेळेत बजावा. त्यासाठी कोणी आग्रह करण्याची वाट पाहू नका.

३. उमेदवाराचे चारित्र्य, सार्वजनिक कार्य, गुणवत्ता, संबंधित राजकीय पक्षांची आजवरची कामगिरी आणि विविध प्रश्‍नांच्या संदर्भातील भूमिका, यासर्वांचा विचार करून मत द्या.

४. निर्भयपणे मतदान करा. प्रलोभनाला, दडपणाला बळी पडू नका.

५. जात, धर्म, घराणे अशा निकषांवर मतदान करू नका.

६. केवळ दोषारोपांचे राजकारण करणारे, बोलघेवडे आणि कर्तबगार उमेदवार यांच्यात फरक करा. कर्तबगारीला साथ द्या.

७. मतदानासाठी जाण्यास कोणत्याही सुविधा स्वीकारू नका.

८. जातीय, धार्मिक स्वरूपाचा भडक प्रचार आणि अफवा यांना साह्यभूत होऊ नका. मतदानासाठी जाति, धर्मविषयक आवाहनांना प्रतिसाद देऊ नका. समाजात फूट पाडणाऱ्या प्रवृत्तींना थारा देऊनका.

९. शांतता व सलोखा राखण्यास संबंधित यंत्रणेला मदत करा. निवडणुकानंतरच्या संभाव्य गैरप्रकारांना वाव मिळू नये, याचा विचार आधीच करून मतदान करा.

१०. खोटे मतदान हा दखलपात्र गुन्हा आहे. गैरप्रकारांना हातभार लावू नका. गैरप्रकार उजेडात आणण्यासाठी संबंधित यंत्रणेला मदत करा. हिंसा, दहशत यांना भीक घालू नका. लोकशाही बळकट करण्याचा विचार मनात ठेऊन मतदान करा.

११. मतदान इलेक्‍ट्रॉनिक यंत्राद्वारे असल्याने एकदा बटन दाबल्यावर ते पूर्ण होते. यामुळे मतदान कोणाला करायचे याचा पूर्ण विचार करूनच बटण दाबा.

१२. उमेदवार पात्र नाहीत, असे आपले मत असल्यास तसे जाहीर करून नोंदवहीत नोंदवून नकाराधिकार बजावा. बोटाला शाई लावून घ्या.

१३. आपले मत मोलाचे आहे. त्यावर आपले आणि राज्याचे भवितव्य अवलंबून आहे, विचारपूर्वक आणि काळजीपूर्वक मतदान करा.

लोकल ते ग्लोबल दहिहंडी..

लहानपणी साजरे केलेले सनवार आता आठवले की मला मोठी गंमतच वाटते. त्यावेळी शाळेचा अभ्यास तसा थोडाच कमीच आसायचा आणि हल्लीच्या ट्युशनच तेव्हा फँड ...