Monday 30 April 2012

दिल्ली पुढे झुकला महाराष्ट्र !!

शिवप्रभुच्या पदस्पर्शाने पावन झालेली हि महाराष्ट्र भुमी एके काळी दिल्लीच्या तख्ताला घाम फोडुन सह्याद्रीच पाणी पाजनारी ही पावन महाराष्ट्र भुमी, या महाराष्ट्राचे जेवढ गुण गाऊ तेवढ कमीच आश्या या नवविविधतेने नटलेल्या महाराष्ट्र भुमित त्रिवार मानाचा मुजरा !! आज 1 मे अर्थातच महाराष्ट्र दिन अथवा कामगार दिन 52 वर्षापुर्वी संयुक्त महाराष्ट्राचा लढा पुर्ण होवुन मुबंई सहीत संयुक्त महाराष्ट्रचा मंगल कलश महाराष्ट्रात येवुन नव्या राज्याची स्थापना झाली तोच हा स्ववर्ण दिन. मुंबई सहीत संयुक्त महाराष्ट्र निर्मिती साठी शहीद झालेल्या 105 हुताम्याचा बलीदान दिवस, अर्थातच आजच्या या सुवर्ण दिनी दळभद्री सरकारला शिव्या देवु तेवढ्या कमीच कारण महाराष्ट्रच्या अधोगतीचा वेग पाहील्य कोणताही सर्वसामान्या या सरकारला शिव्या शापच देत आसेल यात शंका नाही. एके काळी दिल्लीचे तख्त हदरवनारा महाराष्ट्र आज दिल्लीला मुजरा करतोय आणी नेहमी प्रमाणे महाराष्ट्राच्या पदरी फक्त उपेक्षा येते. दुष्काळ आसो विजेचे भारनियमन आसो, किंवा शेतकर्याच्या अत्महत्या, सगळ्याच प्रश्नावर सत्ताधारी मुग गिळुन बसलेत आणि विरोधक ही अक्रमक नाहीत आसो सगळी कडे फक्त शिमगा सुरु आहे . राजकर्ते बेफाम झाले आहेत आणी जनता षंढ, कोणाला कोणाच काही नाही ? ज्या शिवप्रभुनी रयतेचे राज्या ज्या पावन भुमित बनवले तोच महाराष्ट्र दिल्लीचा गुलाम झाला आहे . देशाचा कारभारा बरोबरच राज्याच्या कारभाराचे देखील बारा वाजले आहेत. संताचा, कवीचा, लेखकाचा, विरांचा लढवय्या महाराष्ट्र कुठे राहीलाय आज ? छत्रपती शिवाजी महारांजांचे वंशज आम्ही आज शर्म वाटली पाहीजेत अम्हाला ? हे सगळ बघतांना, शाहु, फुले, अंबेडकर, टिळक, सावरकर यांचा अदर्श जगाला सांगतोय आम्ही पण आमची पाटी मात्र कोरीच, आसो आजच्या या सुर्वणी आनखी काय लिहनार आणी बोलनार जे घडतयं ते आपल्या संगळ्यांच्या डोळ्या समोर आहे . ह्या महाराष्ट्राचा भुतकाळ (इतिहास) उज्वल आहे पण भविष्य मात्र अंधकारमय आहे किंबहुना एकंदरीत आपरिपक्व राज्याकर्त्यानी त्याची पुर्ण वाट लावली आहे . पुन्हा एकदा हा महाराष्ट्र बलशाली करण्या करती चांगल्या नेऋत्वाची गरज आहे . आर्थातच हे नेऋत्व आपण निर्मान केल पाहीजेत तेव्हाच या प्रगत विकसित आणी तेजेमय महाराष्ट्राच्या पुढे दिल्लीही लोँटांगन घालेल... सर्व मराठी बांधव आणी मायबाप वाचकांना महाराष्ट्र दिनाच्या खुप शुभेच्छा ।।

Friday 13 April 2012

"दै. ग्रामिन न्युज" एक चळवळ बोलकी झाली......

कालच दैनिक ग्रामीन न्युज च्या प्रकाशन आणि कार्यालय उद्घाटन समांरंभ शहापुर मध्ये मोठ्या थाटात पार पडला, खरं तर गेल्या एक वर्षात दैनिकाच्या रजिट्रेशन पासुन ते प्रकाशना पर्यतचा काळ संपादकाच्या जोडीला जवळुन अनुभव घेन्याचा योग या निमित्ताने आला. आजही या कालावधीत आलेले अनुभव खरंच थक्क करनारे होते, दैनिकाच्या प्रत्येक वळनावर एक नविन समस्या त्या समस्याला तोंड देताना झालेली त्रिठातिपट खरंच आजही मन विषन्वय करते. आर्थात या सगळ्याच आडचनी वर मात करत एकाद्या योध्या प्रमाणे आपल्या ध्येयावर अटळ राहत शेवटी तो अंनंदाचा क्षण आमच्या अयुष्यात आलाच. ठाणे जिल्हात ले पहीले ग्रामीन दैनिक वृत्तपत्र ग्रामिण न्युज प्रकाशित झालेच. आखेर एक वर्ष केलेल्या अथक प्रयत्नाना यश आलेच याचा मनोमन आनंद झाला .

गेल्या तिन वर्षापासुन मासिक नवी चित्रधारा संपादक कम मित्राच्या जोडीने काम कारीत आहे. या तिन वर्षाच्या काळात शहापुर तालुक्यातील आनेक प्रश्न शासन दरबारी मांडन्याचा प्रामाणिक प्रयत्न आम्ही करीत आहोत. अर्थातच हे प्रश्न आजुनही तसेच पडले आहेत तो भाग वेगळा, पण मासिक नवी चित्रधारा मध्ये काम करतांना खरी पत्रकारीता(सेटीँग विरहीत) कशी आसावी याचा पुर्ण अनुभव या कळात आला.पण हा अनुभव पाठीशी आसतांना ही एका ही दैनिकाने प्रतिनिधी म्हणुन काम दिलं नाही याच नवल वाटतं काहीकांनी काम दिल पण ते पत्रकार कम अँड एजंट जास्त होते, आणि ती आँफर स्विकारन आमच्यात कदापी शक्य नव्हते. आसो तो भाग वेगळा पण मासिकात काम करतांना खुप अडचनी येत होत्या हाती आसलेल्या आमच्या बातम्या कोणी लावत नव्हता कोणा कडे दिली तर पस्परर सेंटीग केली जायची त्यामुळे एक मोठी कोंडी झाली होती हि कोंडी फोडायची कशी याच विचारात आसतांना संपादकाने स्वःताच दैनिक काढन्या विषयी विचारले आणि क्षणातच नैराश्य दुर होवुन पुढच्या क्षणी होकार दिला. ग्रामीन भागातुन एखादे दैनिक सुरु करण किबहुना ते चालवने म्हणजे एक मोठे आव्हान आहे पण हे आव्हान आम्ही स्विकारलयं ते एक चळवळ म्हणुन इथे हि काही जन वळवळ करायला येतीलच पण आश्या हजारांना पुरुन उरेल येवढ बळ या लेखनीत आहे त्यामुळे त्याची चिंता नाही.

दैनिक ग्रामीन न्युज एक चळवळ आहे तुमच्या माझ्या अस्वस्थ ग्रामीन भागतल्या तरुणांची, हि चळवळ आहे भ्रष्ट्राचार्या विरोधातली हि मग्रुर लोकप्रतिनिला वढनीवर आनन्या साठी भुमाफियाना चाप देन्या साठी आन्याया विरुध्द लढन्या साठी मुजोर अधिकार्याना माज उरवन्या साठी आणि मायबाप गोर गरीब जनतेची सेवा साठी आणि ग्रामीन विकासा साठी. खुप काही झेलत हा प्रवास सुरु केलाय, एकदा गलबत समुद्रात लोटल्या वर वादळवार्याची तमा कोण बाळगतोय तसच काहीसं झालयं आता माघार नाही. फक्त तुमच्या आशिवादाची आणि सहकार्याची जोड पाहीजेत.
दै. ग्रामीण न्युज सर्वसामान्याचा एक आवाज आहे. जो आवाज अजुन पर्यत शासनाच्या आणि राज्यकर्ताच्या कानावर कधी पोचला नव्हता पण काही दिवसातच या आवाजाने सरकारच्या कानठळ्या बसनार आहेत . देशातील एक नंबर जिल्हा म्हणुन ठाने जिल्हाचा नावलौकीक आहे . पण येथे ग्रामिन भागाचा विकास किती झालाय ? जिल्हा विभजध आजुन होत का नाही ? आसे आनेक प्रश्न आहेत आनेक समस्या आहेत ? ज्यांची उत्तरे सरकार कडुन घ्यायची आहे आनेक पिडितांना न्याय करायचा आहे आता रोजच भेटु नव्या रुपात नव्या अवेशात..
दै. ग्रामिण न्युज चे संपादक कम मित्र "उमेश भेरे" यांनी आपल्या या चळवळी मध्ये जो विश्वास दाखवुन मला सहभागी केले किंबहुना काही जबाबदार्या दिल्या त्या बद्दल करु तेवढे धन्यवाद कमीच आहेत. दै. ग्रामिन न्युज च्या या चळवळी सहभागी आसनार्या आनेक ज्ञात अज्ञात मित्रांचे आणी मायबाप वाचकांचे ही खुप खुप आभार !! आता पर्यत आमच्यावर प्रेम करनारे आमचे हितचिंतक वाचक आणि मायबाप जनता यांचे वेळप्रसंगी सावरनारे मदतीचे हात सोबत आहेत म्हणुन आता पर्यतचा प्रवास सुककर झाला पुढे ही आसाच लोभ आसावा !!

धन्यवाद !!!

प्रशांत गडगे

संयुक्त संपादक
दै. ग्रामिन न्युज.

Sunday 1 April 2012

रामराज्य ते लोकराज्य.....

आज रामनवमी तमाम हिंदु बांधवांच्या आराध्य दैवत प्रभु श्री रामचंद्र यांचा जन्म दिवस. राम म्हटलं की सर्वात प्रथम आठवते ते गांधिव धणुष्य आणि ते लियया पेलुन या भारत भु वर रामराज्य स्थापण करनारा महापराक्रमी, पुरुषोत्तम, नाना उपाधी अंलंकृत राजा श्री राम ! आपल्या संपुर्ण आवतार काळात एक गुणी पुत्र, गुणी पती आणि एक गुणी बाप कसा आसावा याची मुल्य तुम्हा आम्हाला आपल्या वागनुकीतुन शिकवनारा पुरुषोत्तम राम !

ज्या वेळेस पिता दशरथाची आज्ञा शिरवंद्या मानुन सकल राजयोगाला धुडकवुन वनवासाला निघालेला राम आणि वनवासात ही रावनाचा वध करुन दिग्विजय करुन पुन्हा परत येनारा राम !

वनवासात हंनुमंत सुग्रीव जामुंवत आश्या शुर विरांन सह युध्द कौशल्य पणाला लावुन आही रावन, मही रावन, बाली, इंद्रजित, कुंभकर्ण, रावन, आश्या आनेक योध्दांना धर्मनिती ने परास्त करनारा राम !

आजुन काय काय सांगु रामा बद्दल ज्या पुढे हंनुमंता सारखा महावीर परक्रमी नतमस्तक किंबहूना श्री रामाचे दास्यत्व घेतो तेथे तुम्ही आम्ही तर कस्पटा समान.

रामराज्य म्हणजे धर्मावर अधारित राज्य, ज्या तत्वांना धर्ममान्यता आहे आश्या तत्वांच्या आधारावर चाललेले कुठलेही राज्य हे रामराज्या आसतं शालिवहना पासुन ते शिवछत्रपतीच्या हिंदवी स्वराज्य पर्यत सगळीच राज्या धर्माच्या आधारावर चालत होती म्हणुनच ती राम राज्य होती आणि 1947 पासुन आम्ही गांधी आणि नेहरूच्या नेऋत्वा खाली लोकराज्य स्विकार केला आणि तेथेच आमचा घात झाला आणि अम्ही कायमचा मुकलो रामराज्याला..

राम राज्यात आर्थिक सुबत्ता होती योग्य प्रशासन होते धर्म होता आणि योग्य न्याय संस्था ही..म्हणुनच रामराज्यात लोक अंनदाने भरभराटीने जगत होती आणि आज आमच्या लोक आता यातल काय उरयल ते सांगा ना ? सगळी कडे भ्रष्ट्राचार बोकाळलाय, बलात्कार खुन दरोडे तर राजेरोस पणे चालु आहेत आनेक खटले न्यायालयात तसेच पडुन आहेत, माहागाईच तर सांगुच नका ?
"लहरी राजा आणि प्रजा अंधळी आंधातरी दरबार "
आशीच काही आवस्था आमच्या भारताची झाली आहे .आणि धर्माच तर काय आमच्या रामजन्मभुमी साठी आम्हाला न्यायालयात न्याय मागावा लागतो ? या पेक्षा मोठी शोकांतीका काय ? आमचे देव देवळातुन चोरीला जातात त्यांच्या साठी अंदोलन करावे लागतात, यावरुनच कळते या देशात धर्मावर किती आस्था उरली आहे आसो तो भाग निराळा विषय आहे तो रामराज्य ते लोकराज्य ? काय चाललय या देशात कुठुन कुठे आलोय आपण , एके काळी सगळं जग कुतुहुलाने भारता च्या अदर्श संस्कृती कडे पाहायचा ती संस्कूती गेली कूठे देशचालवनारे पण भ्रष्ट्र झाले आणी आणि देशात राहणारे पण ?कंटाळाच आलाय म्हण ना ?. मग कसे आवतरेल इथे रामराज्य सगळीच नितीमुल्ये पायदळी तुडवत तुम्ही आम्ही रामराज्याची अपेक्षा करनार तर ते कस शक्य आहे . फक्त रामनवमी च्या दिवशी रामाचा पराक्रम आठवायचा आणि उरलेल्या दिवशी रावन पुजायचा याला काय अर्थ आहे का ? जर पुन्हा एकदा रामराज्य स्थापण करायचे आसेल तर प्रभु श्री रामाचा अदर्श पुढे जरुर ठेवा पण त्यांची प्रत्यक्ष वाट पाहु नका, स्वाःताच राम व्हा !! आणि आपल्या अजुबाजुला आसनार्या भ्रष्ट्राचार महागाई आणि आशाच सगळ्या कुप्रवृत्तीचा नाश करन्याचा प्रयत्न करा नक्कीच एक दिवस तरी पुन्हा एक नव्या रामराज्याची स्थापणा या भारतात होईल यात शंका नाही.

लोकल ते ग्लोबल दहिहंडी..

लहानपणी साजरे केलेले सनवार आता आठवले की मला मोठी गंमतच वाटते. त्यावेळी शाळेचा अभ्यास तसा थोडाच कमीच आसायचा आणि हल्लीच्या ट्युशनच तेव्हा फँड ...