Tuesday 20 November 2012

भगव्या सुर्याचा आस्त ...





भगव्या सुर्याचा आस्त.....

बाळासाहेब एक नाव, नव्हते एक वयल होते.ज्याने संपुर्ण महाराष्ट्र व्यापला होता. गेली पाच दशके तमाम हिंदु आणि मराठी माणसाच्या ह्रदय सिंहासनावर आधिराज्य गाजवनारे हिंदुस्थान मधील एकमेव नेते म्हणजे बाळासाहेब !! ज्यांच्या ऐवढी किर्ती क्वचितच कोणत्या नेत्याला मिळते. सत्ताधारी आसो वा विरोधक  नेहमीच त्यांना वचकुन आसायचे. त्यांच्या एका शब्दापुढे मोठे मोठे नेते नांगी टाकायचे येवढे आफलातुन नेते म्हणेजे एकच बाळासाहेब ठाकरे ! सुरुवातीच्या काळात बाळासाहेब एक व्यंगचित्रकार उदयाला आले पण मराठी भाषकांवर होणार्या आन्याला वाचा फोडनार्या व्यंगचित्रांना प्रसिध्दी न देनार्या फ्री प्रेस वृत्तपत्राला कायमची सोडचिठ्ठी देवुन त्यांनी 13 आँगस्ट 1960 मध्ये मार्मिक या साप्ताहीकाची स्थापना केली आणि तिथेच महाराष्ट्राच्या राजकारणात आणि समाजकारणात एक नव्या संघर्षची नांदी झाली. किंबहुना एका भगव्या सुर्याचा उदय झाला. मार्मिक  मधुन प्रसिध्द होणारी व्यांगचित्रे ही प्रामुख्याने मुंबईतील मराठी माणसावर होणार्या आत्याचारावर आधारीत आसल्याने अल्पावधितच बाळासाहेब प्रसिध्दी झोतात आले. आणि इथुन पुढे थंड पडलेल्या, ग्लानी आलेल्या लाखो मराठी बांधवांना चेतवुन त्यांचा एका मोठा लढा उभारन्याचे शिवधनुष्य बाळासाहेबांनी पाच दशके लिलया पेललं आर्थात यामागे त्यांची महाराष्ट्रा प्रति आसलेली नितांत श्रध्दा आणि तगमग हीच खरी शक्तीस्थान बनुन सुरुवाती पासुन शेवट पर्यत त्यांच्या मागे भक्कमपणे उभी होती.

     दाक्षिणात्यांची मुजोरी दिवसेंनदिवस वाढत होती. याची चिड तर सगळ्याच मराठी बांधवाना येत होती पण या विरुध्द आवाज उठवनार कोण ? आणि आशा वेळी बाळासाहेबांनी मार्मिक मधून मराठी माणसाला आवाज दिला. आणि शेकडो तरुण पेटुन उठले याच पेटुन उठलेल्या तरुणांना बाळासाहेबांनी नेऋत्व दिले आणि 19 जून 1966 शिवतिर्थावर शिवसेनेचा जन्म झाला. संयुक्त महाराष्ट्राचा लढा आसो किंवा उठाव लुंगी बजावो पुंगी सारख्या अदोलानांनी आख्खा महाराष्ट्र पेटुन उठला तो आज मिती पर्यत शांत झालाच नाही हेच बाळासाहेबांचे मोठ यश.23 जाने 1989 रोजी सामना या वृत्तपत्राच्या माध्यमातुन त्यांनी आपला विचार आनेक शिवसैनिकांपर्यत आपला विचार नुसता पोहचवलाच नाही तर रुजवला देखिल.आपल्या आमोघ आणि प्रतिभाशाली वकृत्वाने त्यांनी लाखो लाखो जनसमुदायाच्या सभा आशा जिंकल्या. सभेला आलेल्या तरुणांना नेमके काय हवे याची नाडी ओळखुन बाळासाहेब अतिशय मार्मिक आणि शेळक्या शब्दात देशातल्या भल्या भल्या नेत्याचा आपल्या ठाकरी शौलीत खरपुस समचार घेत. आणि त्यांची हिच वृत्ती जनमासात प्रचंड लोकप्रिय झाली. पूढे त्यांच्या भाषनाचा कैफ आसाच वाढत गेला आणि दिवसागणित महाराष्ट्राचे बाळासाहेबांन वरचे प्रेम वृध्दिंगंत होत गेले यात शंका नाही.

    गेली पाच दशके बाळासाहेब शिवसेनाप्रमुख म्हणुण अवघ्या महाराष्ट्राच्या ह्रदय सिंहासनावर विराजमान आहेत. बाबरी मशिद पाडनार्या शिवसौनिकांची जाहिर पाठ थोपाटनारे किंवा हिटलर चा समर्थन करणारे बाळासाहेब थोड्याच काळात आवघ्या देशातल्या हिंदुच्या गळ्याचले ताईत बनले आणि तिथेच त्यांना हिंदुह्रदयसम्राट हि उपाधी बहाल झाली. मराठी बरोबरच हिंदुत्वाला प्राधान्या देनार्या बाळासाहेबांनी पोटात एक आणि ओठात एक आशी भुमिका आल्या अयुष्यात कधीच घेतली नाही. पाकिस्थानला मुंबई खेळन्यास घातलेली बंदी आसो किंवा पाकधर्जिन्या पाकड्यावर केलेले थेट भाष्य आसो किंवा बांग्लादेशीघूसखोरांनवर घेतलेली भुमिका आसो या मुळे जागतिक पातळीवर देखिल बाळासाहेबांचे नाव आदराने घेतले जाई. यात नवल नव्हते.  जात पात विरहित राजकारण त्यात ही 80% समाजकारण आणि 20 % राजकारण हे सुत्र देवुन लाखो शिवसौनिक घडवनारा हा नेता काही निराळाच !!

बाळासाहेब एक झुंजार नेता वक्ता तर होतेच पण माणुस म्हणुण ते एक असामन्य होते .त्यांची तुलना कराची झालीच तर फक्त सुर्याशी होऊ शकते,आहो रात्र कधीही न थकता फक्त जनकल्याना साठी झटनार्या सुर्याप्रमाणे बाळासाहेब आजीवन झटत राहीले आखेरच्या श्वासा पर्यंत ते झटत होते..

त्यांच्या जीवन प्रवासात त्यांनी आनेक मित्र कार्यकर्ते शिवसैनिक जोडले जशी जशी वेळ वाढत गेली शिवसेनेचे तेज वाढत गेले.याच तेजातुन मग छगन भुजबळ, मनोहर जोशी, नारायन राणे, राज ठाकरे, उध्दव ठाकरे आसे आनेक द्गिज नेते जन्माला आले किंबहुना साहेबांनी ते घडवले! यातले काही एक निष्ठ राहीले काही फितुर झाले, पण बाळासाहेबांनी त्याची पर्वा कधी केली नाही. ते एका व्रतस्त योध्या प्रमाणे फक्त प्रामाणिकपणे लढा देत राहिले. आखेर 1995 मध्ये तो दिवस उजडला, शिवसेनेच्या तेजाने संपुर्ण महाराष्ट्र तळपु लागला .शिवसेनेचा भगवा ध्वज आखेर विधान सभेवर फडकला आणि बाळासाहेबांचे नेऋत्व सर्वमान्य झाले.आणि केवळ दुर्देव म्हणुण आवघ्या पाच वर्षात हे तेज कमी झाले आणि शिवसेनेच्या हातातुन सत्ता निसटली ती आज मितीपर्यत.. याच काळात साहेबांनी स्वःता घडवलेले नेते शिवसेनेला जय  महाराष्ट्र करीत विरोधकांच्या छावणीत दाखल झाले पण बाळा साहेबांची हिंम्मत खचली नाही एका धिरोद्दत्त योध्या प्रमाणे नाना अडचणीवर मात करीत ते लढत राहीले, कधी अप्तस्वकियांशी तर कधी विरोधकांशी यामध्ये ही त्यांचा ठाकरीबाणा कायम होता हे आपल्याला विसरता येनार नाही.

    बाळासाहेब एक रसायन होते . एका का ते बोलायला लागले की अपोआप रक्त गरम होई आणि माणुस चेतवुन उठे याच मुळे शिवसेनेत तरुणांचा मोठा सहभाग आहे . आज गावो गावी सेनेच्या शाखा चांगल्या काम करतात त्याची मुख्य प्रेरणास्रोत फक्त बाळासाहेब ! हळु हळु वय वाढत होते बाळासाहेबांच्या विचारांना नाही पण शरीरांना बंधने येत होती, पण त्याची पर्वा न करताच बाळासाहेब नेहमीच मैदान उतरुन विरोधकांना चारी मुंड्या चित करण्याच वेगळच तंत्र त्यांना अवगत होते. जनमासांची नस आणि नस ओळखनारे बाळासाहेबांना आता स्वःताच्या प्रकृतीची शंका येत होती आणी आत्ताच्या दसरा मेळाव्यात त्यांनी हि खंत बोलुन ही दाखवली आणि तमाम हिंदुस्थान दुर्देव ती शंका खरी ठरली, आणि सलग चार दिवस मृत्युला झुंजत ठेवनारे बाळासाहेब काळाच्या स्वाधीन झाले. आपल्या 86 वर्षाच्या कारकीर्दीत एक राजनेता मुत्सद्दी सेनापती, द्राष्ट्रा नेता,  धुरंधर वक्ता, कुशल व्यंगचित्रकार, निर्भिड पत्रकार, आश्या आनेक पदव्या ज्याच्या पायाशी लोळन घालत होत्या. करोडो शिवसौनिकांच्या ह्रदयात ते मानाने विराजमान झाले होते.याची प्रचिती अवघ्या जगाला त्यांच्या अंतयात्रे वेळी आलीच आसेल .30 लाखाच्या जमावाने सअश्रु आणि शोक अनावर डोळ्यांनी त्यांना निरोप दिला . न भुतो नभविष्यात आसा नेता होणे शक्य आवघ्या महाराष्ट्राला बाळासाहेबांची पोकळी पुढची काही दशके नक्कीच जानवेल . जनमानसावर आपल्या कतुर्त्वचा वेगळाच ठसा उमटवन्यार्या एकमेव बाळासाहेब ठाकरे या तेजोवलयाला माझा त्रिवार मुजरा !!

आ. सरसेनापती हिंदुह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे याना सआश्रु नयनानी भावपुर्ण अदरांजली ।।     �

�

�


Friday 2 November 2012

जागर स्रीशक्तीचा !


आज एकविसाव्या शतकात आपण प्रवेश करुन

एक तप उलटले, आबला म्हणुन उपेक्षीत

राहिलेली स्री शक्ती आज सबला म्हणुन

पुरुषांच्या खांद्याला खांदा लावुन सर्वच क्षेत्रात

आघाडी वर आहे , चुल आणि मुल

ही संकल्पना तर पुर्ण लयाला गेली आहे.

मागच्या काही वर्षात महीलांनी पुरुषांन

पेक्षा सरस कामगिरी करत यशाची नव नविन

शिकरे पार केली पण हे सगळं आसचं शक्य

नव्हते. त्यासाठी आनेक लढे उभारले गेले, लढले

गेले, त्यात सावित्री बाई फुले यांच स्थान

अग्रभागी आसेल, 1 जाने. 1948

रोजी त्यांनी मुलींन

साठी पहीली शाळा काढली आणि स्री शिक्षणासाठी पहिला मोठा लढा त्यांनी उभारला आणि पुढे

हा लढा यशस्वी झाला. सामाजिक आणि धार्मिक

रुढीनी बरबटलेल्या समाजात स्री फक्त उपभोग्य

आहे. चुल आणि मुल व्यतीरिक्त ती काहीच करु

शकत नाही हा समज

चुकीचा ठरला आणि आता काही दशकामध्येच

स्रीयांनी केलीली प्रगती किती दैदित्यमान आहे

यात शंका नाही.पण याची डावी बाजु पण आपण

निट पाहिली तर आजुन ही आंधारच दिसतो.

एकविसाव्या शतकात खुप

प्रगती झाली आसली तरी आजही वृत्तपत्रात

येनार्या बहूतेक बातम्या ह्या स्री वर

होणार्या अत्याचाराच्याच असतात , बलात्कार ,

विनयभंग , अत्याचार, मारहान,

या बातम्या स्वःताला महासत्ता म्हणवनार्या देशाला भुषनावह

आहेत का ? स्रीया आज सर्वच क्षेत्रात

अघाडीवर आहेत, पण

पुरुषी अहंकाराला त्यांना पावलो पावली सामोरे

जावेच लागते ! स्रीयांना आता 50% टक्के

आरक्षण मिळाले आहे त्यामुळे

राजकारणातही मोठा सहभाग आसेल पण

शहरी भाग वगळता ग्रामिन

भागातली स्री आजुनही थोडी मागासलेली राहीली आहे ,

हे भिषन वास्तव आपल्याला नाकारुन चालनार

नाही. आज शतके लोटली खुप बदल झाले, पण

स्रीचा स्रीशी चाललेला संघर्ष काय

संपला नाही. स्री भ्रुण हत्या ,हुंडाबळी,

ही त्याची ताजी उदा. लज्जास्पद आहेत.

आर्थात स्री भ्रुण हत्या सारख्या प्रकरणात

सबला झालेली स्री पुन्हा आबला केव्हा झाली हे

कळलच नाही.

प्रसंगी रणचंडीका होणारी स्री आज

पोटच्या गोळ्याला देखील डोळ्यात पाहत

नाही इतकी निष्ठुरता आली कुठून ?आसो इकडे

सरकार उपाय योजना करण्या मशगुल आहे आणि

एकीकडे स्री भ्रुण हत्येचे प्रमाण वाढचत चालले

आहे यावरुन सरकारचे गांभिर्य समजुन येते.

आजची स्री खरंच खुप प्रगत सुशिक्षीत

झाली पण समाजाची मानसिकता आजुन बदलत

नाही. आज पुरुषांच्या खांद्याला खांदा लावुन

काम करताना देखील स्रीयांना आनेक शारिरीक

आणि मानसिक

गोष्टीचा सामना करावा लागतो पण

या सगळ्यावरच मात करीत

ती आजुनही परीस्थितीची झुंजतेच आहे.

आणि तिचा हा संघर्ष कधी संपेल

याची शाश्वती नाही.

आद्या स्री शक्तीची प्रणेती जिजावु माँसाहेब,

झाशीची राणी लक्ष्मी बाई, सावित्री बाई फुले ,

अनंदीबाई जोशी , इदिरा गांधी ,

सरोजीनी नायडु ,ते साधना आमटे,

निलीमा मिश्रा,लता मंगेशकर ते प्रतिभा ताई

पाटील आशा कित्येक

रणरागिनी नी स्री शक्तीचा इतिहास

स्फुर्तीदायी केला आहे .

या रणरागीनीच्या कामाची दखल तर

आवघ्या जगाने घेतली. पण

स्री शक्तीच्या आस्तित्वाची लढाई

आजुनही सुरुच आहे . एके काळची आबला आज

सबला बनुन सगळ्याच क्षेत्रात मोठ्या हिम्मतीने

वाटचाल करीत आहेत .

कधी तरी स्री शक्ती हिच देशशक्ती होईल

आणि जग पालथे घालील आणि इतिहास

तिची नोंद घेईल यात शंका नाही . पण स्रीयांन

समोरील आजची आव्हाने मोठी आहेत.

ती पेलवताना होणारी दमछाक आम्हाला कळते.

पण एक दिवस नक्कीच पुरुषी मानसिकता बदलेल

आणि त्याच

दिवशी स्री शक्तीचा खर्या आर्थाने जय होईल

याची खात्री वाटते .

आसो स्री चा चाललेला संघर्ष आजचा नाही.

युगा युगांपासुन तो सुरु आहे . पण

ही रणरागीनी कधी थकली नाही. का कधी तिने

परिस्थिती समोर गुढगे ही टेकले नाही . ती लढत

राहीली अविरत लढत राहीली, तिने

शिवाजी घडवला, तिने संभाजी घडवला, तिनेच

भगसिंग, आणि अंबेडकर घडवले, पण

तिचा स्वःताचा संघर्ष संपला नाही.

तिचा हा संघर्ष अविरत चालला आहे. आशा आहे

या शतकात तरी आता पर्यत फक्त कागदावरच

राहिलेली स्री पुरुष समानता खर्या आर्थाने

जनमानसात रुजवली जाईल. याच

स्री शक्ती ची ताकद खुप मोठी आहे .

समाजातील अनिष्ट रुढी पंरंपरा आज्ञान यामुळे

आज अनेक ठिकाणी महिलांना अनादर

केला जातो, पण सध्या जागतिक करणाचे वारे

वेगाने वाहत आहेत, शिक्षण

आणि तंत्रज्ञानाचा प्रसार मोठ्याने होत आहे,

ज्या प्रमाणे बदल सृष्टीचा नियम आहे. त्याच

प्रमाणे स्री कडे बघन्याचा सामाजाचा दृष्टीकोन

आता बदलु लागलाय. भविष्यात नक्कीच

आर्थिक. सामाजिक, राजकिय, वा इतर

कुठल्याही क्षेत्रा मध्ये स्री शक्ती अग्रेसर

आसेल यात शंका नाही , पण

स्री शक्तीचा हा जागर आसाच सुरु राहु द्या !

कदाचित याच जागरातुन

एखादी रणचंडी आवतरीत होईन आणि या पिचलेले

खिळखिळ्या झालेल्या लोकशाही नव

संजिवनी देईल आसा आशावाद

बाळगायला तुर्तास हरकत नाही.

हि दिवाळी आमच्या तमाम

वाचकांना हितचिंतकांना भरभराटीची आणि जावो हिच

सदिच्छा !!

लोकल ते ग्लोबल दहिहंडी..

लहानपणी साजरे केलेले सनवार आता आठवले की मला मोठी गंमतच वाटते. त्यावेळी शाळेचा अभ्यास तसा थोडाच कमीच आसायचा आणि हल्लीच्या ट्युशनच तेव्हा फँड ...