Tuesday 31 July 2012

पुन्हा एकदा आण्णा...

9 आँगस्ट म्हणजे क्रांती दिन, मागच्या वर्षी याच दिवशी आण्णांनी जंतरमंतर आशी काय जादु मारली आणि काँग्रेस पळता भुयी थोडी झाली, अर्थात आण्णानी त्या वेळी आखलेली रणनिती आणि त्या वेळचं वातावरन हे दोघे आण्णानी सुरु केलेल्या अंदोलनाला पोषक होते आणि तेच अंदोलन बेसावध काँग्रेसच्या वर्मी लागले. आण्णांच्या या अंदोलनाचा प्रभाव येवढा मोठा होता की देशात सर्वत्र काँग्रेस विरोधी एक मोठी लाट निर्मान झाली आणि त्यावेळी गलित्रान झालेल्या काँग्रेसची अवस्था खरचं पाहण्याजोगी होती आसो तो भाग निराळा पण आज पुन्हा एकदा आण्णानी 1 आँगस्ट जनलोकपाल च्या मंजुरी साठी मोठ्या अंदोलनाची रणनिती आखली आहे. आता यावेळी या अंदोलनाला किती प्रतिसाद मिळतो आणि मागच्या वेळी झाला तोच तमाशा पुन्हा यावेळी होतो की काय आशी शंका मनात येते. पण मागच्या वेळी बेसावध आसलेली काँग्रेस आणि सरकार या वेळी चांगलेच सावध झाले आहे.

आपल्या कुट निती प्रमानेच रणनीती अखुन लवकरात लवकर हे अंदोलन कसं अपयशी करता येईल याची तयारी करत आहे आणि त्याची प्रचिती आपण रोज बघतो आहोत. आण्णांच्या आता जंतरमंतर सुरु आसलेल्या अंदोलनात कोण एक प्रसारमाध्यमांनवर टिका करणारे बँनर लावतो आणि आख्खी मिडीया निमित्ताला कारण म्हणुण त्याच खापर आण्णांवर फोडते आहे आहे .आता अंदोलनात कोणताही सुज्ञ कार्यकर्ता आसं काही करनार नाही हे समजन्या इतपत भारतीय प्रेषक काय मुर्ख नाहीत ? आसो या निमित्ताचा कारण साधुन काँग्रेस सहीत सगळ्या मिडीयाने आण्णा विरुध्द डंका पिटायला सुरुवात केली. कालपर्यत काळ तोंड लपवुन फिरनार्या काँग्रेस च्या काही चाहटाळांनी याच विषयावर मनसोक्त टवाळी तर करुन घेतली पण प्रसारमध्यमांचा बदलता रंग पाहुन मला जरा अश्चर्यच वाटले ? काल पर्यत अण्णांना डोक्यावर घेनारे आज अचानक अण्णांना पाण्यात कसे पाहु लागले ? एक वर्षात मत परिवर्तन होऊ कसं शकत ? मिडीया इतरांन टिका केलेली चालतेय ना ? मग मिडीयावर कोणी टीका तर तर का नाही सहन होत मिडीयाला ? नक्कीच इथे काही गोम आहे ? आसो एकवर्षात काय अर्थकारण झाल आणी मिडीया बदली पण लोक ? प्रणम मुखर्जी राष्टपती काय झाले आणी सगळ्या काँग्रेसची पापे धुवुन गेली की काय ? एकंदरी चित्र तर तसंच दिसतयं !
महागाई , भष्ट्राचार वाढतच चाललेत फक्त तुमच्या आमच्या अंगातली रग कमी होत चाललेय ,सरकार आम्हाला लुळ पांगळ बनवतयं आम्हीही तो पांगळेपणा हसत हसत स्विकारतोय आशी शंका येते. " नेते अंनंदी आणि जनात केवीलवाणी" आशी देशाची अवस्था झाली आहे . आज बंड नाही केल तर क्रांती होईलच कशी. तूमच्यात हिम्मत नसेल बंड करायची तर जे बंड करतात त्यांना थोड सहकार्य तरी करा ,कदाचित आजच्या या बंडातुन उद्याच्या पिढीकडे क्रांतीच बिजे तरी पोचतील, बंड लहान आसो किंवा मोठे पण सुरुवात तर झाली पाहिजेत? आण्णांनी केली आहे सुरुवात समरोप आणी आणि भ्रष्ट काँग्रेसला नारळ कोणी द्यायचा हे तुम्हीच ठरवा. टाँईम्स मासिकाना ने तर आपल्या पंतप्रधाना नपुसंकतेचा किताब बाहालच केला आहे , "उज्वल आणि विकसित हिंदुस्थान निर्मान करायला सरकार नालायक आहे" यावर शिक्कामोर्हतब ही झालंच आहे , काँग्रेसची ही भ्रष्ट राजवट उथवन्या साठी आंण्णा आणि देशातल्या कोणत्याही काँग्रेस आणि सरकार विरोधी बंडाचे मी समर्थनच करेल, कारण कोणी काही म्हनो काँग्रेस पोटावर लाथ मरते पाठीत खंजीर खुपसते. पण काँग्रेस विरुध्द बंड करनारे तुमच्या आमच्यातलेच आहेत, कोणी चोर दरोडेखोर जनतेचा पैसे खानारे नाहीत. केजरीवाल आणि इतर मंडळी गेली खड्यात निदान आपल्या आण्णांन साठी तर पुन्हा एकदा या रंगगनात उतरावेच लागेल एक नवी क्रांती घडवन्या साठी..........
.
.
प्रशांत गडगे.

Tuesday 10 July 2012

पैसा बोलता है ??

खंरच कधी पैसा बोलु लागला तर ? माणसांची मोठी गोची होईल ना ? आसो हा विनोदाचा भाग झाला पण एका हिंदी चित्रपटातलं हे गाण त्या वेळी खुप लोकप्रिय झाल होत आज ही हे ऐकायला मिळाल की बरं वाटतय. आपण कल्पना ही करु शकत नाही इतक मोठ वास्तव दडलय या गाण्यात . त्या काळी खरचं वास्तवावर आधारलेली गाणी गायली जायची आणि तेवढ्याच आत्मितेने ती ऐकली पण जायची नाहीतर आता ची गाणी आसो पण या गाण्याच्या तिन शब्दात कीती मोठ वास्तव आहे याची प्रचिती आपल्याला आलीच आसेल, किंबहुना पैसा बोलता ही नही सबकी बोलती बंद कर देता है ! आसा नवा वाक् प्र चार रुळु लागला आहे. जो तो पैश्याच्या कमवन्याच्या मागे लागलाय. मग हा पैसा कुठुन ही येवो चांगल्या मार्गाने आसो किंवा वाईट मार्गाने पण प्रत्येकाला पैसा हवा आहे . ती तुमची आमची सगळ्याची गरज बनली आहे. साध्या शिपाया पासुन ते मोठ्या मंत्र्या पर्यत आधिकार्या पासुन ते सर्वसामान्या पर्यत जो तो पैश्याच्या मागे पळत सुटला आहे .नितिमत्ता माणुसकी प्रामाणिकपणा सगळ्याचे बारा वाजवत एकविसाव्या शतकात या गैण ठरत चालल्या आहेत आणि फक्त पैश्या वरुनच माणसाची पत ठरवली जाते किंबहुना जुन्या काळी पैसा फक्त विनिमयाचे साधन होते आज पैसाच सर्वस्व बनला आसल्याची शंका येते.
संस्कृत मध्ये एक छान सुभाषीत आहे.
"अर्थस्य पुरुषो दासः"
याच आर्थ पैसा हा कोणाचा गुलाम नसतो पण तो थोरा मोठ्याना आपला गुलाम करुन घेतो. आणी हे 100% खरं आहे आज पैशाने सगळ्या जगाला गुलाम केल आहे. जो तो सकाळ पासुन रात्री पर्यत घड्याळाच्या काट्या सारखा पैश्याच्या मागे पळत सुटला आहे आणी याच धावपळीत तो आपले आरोग्य, नितिमत्ता, शांती समाधान या सगळ्याच गोष्टी विसरत चालंलाय की काय ? याची शंका येते.माणसाकडे किती पैसा आसावा याचा अंदाज कोणी बांधला नाही म्हणुन की काय जो तो पैश्याचा गुलाम झालाय.
पैसा कमवन्याच्या या हाव्यासाने तर आज देशाची काय वाट लागले आहे ते तुम्ही आम्ही बघतोच आहोत लाख कमवतांना दमछाक होते तिथे करोडो रुपयांचे घोटाळे होतात. चोर्या दरोडे वाढलेत पाच पाच हजारा साठी खुन होतात . आर्थातच याच पैश्यामुळे व्यासनाधिनता वाढत चालली आहेत त्यातुन आत्याचार बलात्कारा सारखे गुन्हे वाढत आहे कुठे गेली नित्तिमत्ता सगळच काही अलबेल ! ज्या पैशा साठी येवढा आटा पिटा चाललाय तोच पैसा कधी बोलायला लागला तर ? फक्त विचार करा काय होईल ? किती तरी 2G स्पेट्रम अदर्श सारख आज्ञात सत्य बाहेर येतील.आसो सांगायच येवढच आहे पैसा विनिमयाचे साधन तो गरजे पुरताच ठिक आहे पण गरजा कधीच संपत नाहीत म्हणुन पैसा कमवावा पण चांगल्या मार्गाने पण हे कोणीच लक्षात घेत नाही आणि जे व्हायच ते झालच आज माणुस पैशाचा गुलाम झाला आणि सगळच संपलं. पैशाच्या बाजारात न्याय नितीमत्ता, प्रामाणिकपणा खुलेआम विकु जावु लागला. एकदा पैसा सर्वस्व झाल्या वर आसच होणार आणि ते किती खरे खोटे आणि खरे हे तुम्हीच ठरवा ? हाच पैसा एक दिवस सर्व मानव जातिच्या विनाशाला कारणीभुत होईल की काय आशी आता येवु लागली आहे .पण आसो जो तो पैश्याच्या मगे धावतोय हि शर्यत कधी संपेल महीत नाही पण शर्यतीत धावनारा प्रत्येक जन म्हणतोय "पैसा बोलता है "? पण काय बोलतोय हे कोणीच ऐकत नाही..

लोकल ते ग्लोबल दहिहंडी..

लहानपणी साजरे केलेले सनवार आता आठवले की मला मोठी गंमतच वाटते. त्यावेळी शाळेचा अभ्यास तसा थोडाच कमीच आसायचा आणि हल्लीच्या ट्युशनच तेव्हा फँड ...