Friday 29 June 2012

धाव विठ्ठला....

आज आषाढी एकादशी अर्थातच अवघ्या वैष्णवांचा अंनंद सोहळा. लहानपणा आषाढी एकादशी ओढ आणि उत्कंठा काय असते ती आजोबांन कडे पाहून नेहमीच अनुभवतो पण हा अंनद सोहळा पाहण्याच भाग्य अजुन नशिबी आलं नाही तो भाग वेगळा पण टिव्ही आणि वाचुन हा सोहळा किती अंनंददायक आहे याची आनुभुती प्रत्येक वारी पाहून येतेच. वर्षभर शेतात कष्ट करनार्या बळीराज्याच अराध्य दैवत म्हणजे पांडुरंग. म्हणुणच की काय ? काळा मातीतला काळा देव म्हणुनच शेतकर्याना कष्टकर्याना हा जास्त भावतो. भक्त पुंडलीकाची मातृ पितृ भक्ती पाहून स्वर्गीय वैभव झुगारुन फक्त भक्ताच्या हाकेला ओ देवुन अठ्ठावीस युगे एका विटेवर अखंड भक्ताच्या कल्याना साठी उभा राहीलेला कलीयुगातला नामनिराळाचा देव म्हणजे पांडुरंग विठ्ठल !!

फक्त पुंडलीकाच्या च नव्हे तर संपुर्ण भक्ताच्या हकेला ओ देनारा आसा हा पांडुरंग कधी ज्ञात अज्ञ्यात पणे आपल्या हकेला देखील धावलाच आसेल आज लाखो वारकरी वारीच्या निमित्ताने शेकडो मैलाचे अंतर पार कर पांडुरंगाच्या चरनी लिन होण्या साठी वारी करतात अर्थात या पंचवीस दिवसात त्यांचा संवाद असतो अंर्तंमनातल्या पांडुरंगाशी . आणि आषाढी च्या दर्शना नंतर नवी उमेद नव्या आशा घेवुन पुन्हा एकदा नवी झेप घेन्याच सामर्थ्य घेवुन लाखो वारकरी पुन्हा घरी परतत आसतात आसो संत ज्ञानेश्वरांना साठी रेड्याच्या तोंडुन वेद बोलवनारा , संत तुकारामांची गाथा तारनारा ,जनाईच्या घरी दळन कांडनारा आश्या अनेक रुपांत ज्याचे अस्तीत्व किंबहुना चराचरात भरुन उरलेल्या पाडुरंगाची महती मी पामर काय गाऊ पण सध्या परिस्थिती खुप वाईट आहे रे पांडुरंगा शेतकर्याचा कष्टकर्याना हा काळ खुप कठीन आहे एकीकडे निसर्ग साथ देत नाही दुसरी भ्रष्ट्रराजसत्ता. कसं व्हायचं कष्टकर्याच ? शेतकरी आत्महत्या करतोय आणि कष्टकरी करखान्यात मरतोय. आता तुच धावुन ये किंबहुना तशी वेळ आली आहे. आता या राजकारण्यावर विश्वास नाही राहीला,सगळ्याच भल करायला आता तुच धाव रे पांडुरंगा ! नाहीतर तेवढी ताकद तरी दे आमच्यात या मतांध रगेल बेगुमान राजसत्ता उलथवला...आजच्या या दिवशी ऐवढच साकडे घालतोय तुला..
.
आषाढी एकादशीच्या विठ्ठलनादमय खुप खुप शुभेच्छा ।।

No comments:

लोकल ते ग्लोबल दहिहंडी..

लहानपणी साजरे केलेले सनवार आता आठवले की मला मोठी गंमतच वाटते. त्यावेळी शाळेचा अभ्यास तसा थोडाच कमीच आसायचा आणि हल्लीच्या ट्युशनच तेव्हा फँड ...