सभोताली जे घडतय ते विपरीत आणि अस्वस्थ करणार आहे, पण जे घडतयं ते आसच घडू द्यायच की त्यात काही बदल करायचा हा निर्णय सर्वस्वी तुमचा. अवतीभोवती घडनार्या घटनांवर मला जे सुचलं ते बेधडक आणि रोखठोक तुमच्या समोर मांडल आहे. याचे परीनाम काही होवो, त्याची पर्वा मी कधी केली नाही आणि या पुढे ही करनार नाही .
Friday 21 December 2012
भांडवलशाहीः गुलामीचे डोहाळे
एकविसाव्या शतकात पदार्पण करुन एक दशक लोटले तरी आज आपल्या देशा पुढील आव्हाने आजुन काही कमी होत नाहीत. आणि आम्ही जगतिक महासत्ता होण्याची स्वप्न पाहतोय, किती हस्यास्पद आहे ? वाढती लोकसख्या , बेकारी , भ्रष्ट्राचार , आत्याचार , एकंदरीत सगळ्या कायदेसुवस्थेचे बारा वाजलेत आसो या मागची कारणे शोधली तर एक मुख्य कारण आपल्या समोर येते ते म्हणजे, काँग्रेस सरकारची चुकीची धोरने आणि संकुचीत विचारसारणी. आणि याच मुख्य कारणा मुळे देशात काही वर्षात आराजकता माजेल यात शंका नाही .
सध्याचे पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी आर्थमंत्री आसतांना अँडाम स्मिथ च्या 200 वर्षापुर्वीच्या मुक्त भांडवलशाही आर्थव्यवस्थेचा स्विकार केला . आणि भारतात सरकारी उद्योगांच्या खाजगीकरणाचा पाया घातला. मुक्त भांडवलशाही म्हणजे 200 पुर्वी अँडाम स्मिथ ने 1776मध्ये वेल्थ आँफ नेशन्स नावाचा पाच खंडाचा ग्रंथ लिहला त्यात त्याने आसे म्हटले की प्रत्येक व्यक्ती स्वःताचे जास्तीत जास्त हित साधते प्रत्येक व्यक्तीला सरकारने अनिर्बंध मोकळी दिली तर प्रत्येक व्यक्ती आपले कमाल हित साध्य करील आणि आपोआपच समजाचे हित होईल. यात फक्त सरकारने कायदा सुव्यवस्था संभाळावी . वर वर मोहक वाटनार्या या मुक्त भांडवशाही आर्थव्यवस्थेने आगदी उलटे केले आणि संपुर्ण देशाचे वाट्टोळ व्हायची वेळ आली तरी सरकार आजुन झोपाच काढतयं का ? आज टाटा बिर्ला रिलायन्स सारखे भांडवल दार देशातल्या सगळ्याच उद्योगांत मुक्त संचार करत आहेत . मानवी गरजा आसनार्या A TO Z उत्पदनात या बड्या उत्पकांची मक्तेदारी सुरु आहे
या स्पर्धेत छोट्या छोट्या व्यापारी देशोधडीला लागले आहेत एंकदरी हा देश भांडवलदारांचा गुलाम होतो की काय आशी शंकेने सर्वसामान्य नागरीक बेजार झाला आहे. एकीकडे गँस पासुन रोशन पंर्यत सगळ्याच सेवा सुविधा सरकार नाकारत आहे . आणि एकिकडे भांडवल शहा जनतेची प्रचंड लुट करत आहे . आता या दुष्टचक्रातुन सुटका करण्या ऐवजी सरकार फक्त भ्रष्ट्राचार आणि स्वहित करण्यातच मशगुल आहे या पेक्षा दुर्देव ते कोणते पुढे काही वर्ष आसेच सुरु राहिलेतर आराजकता माजायला वेळ लागनार नाही . जनता पिचत चालले आधारवड नाही, भविष्यात काय होईल, याची शाश्वती नाही. आशा भिषन परिस्थितीत देशाला सर्वनाशाचे डोहाळे लागले तर नवल काय ?
Subscribe to:
Post Comments (Atom)
लोकल ते ग्लोबल दहिहंडी..
लहानपणी साजरे केलेले सनवार आता आठवले की मला मोठी गंमतच वाटते. त्यावेळी शाळेचा अभ्यास तसा थोडाच कमीच आसायचा आणि हल्लीच्या ट्युशनच तेव्हा फँड ...
-
लहानपणी साजरे केलेले सनवार आता आठवले की मला मोठी गंमतच वाटते. त्यावेळी शाळेचा अभ्यास तसा थोडाच कमीच आसायचा आणि हल्लीच्या ट्युशनच तेव्हा फँड ...
-
✍🏻 प्रशांत गडगे संपादक-सा. विचारमंथन नुकताच निवडनुक आयोगाने पत्रकार परीषद घेवुन महाराष्ट्रात विधानसभा निवडनुकीचा कार्यक्रम जाहिर केला...
-
पत्रकार प्रियेश जगे यांनवर झालेल्या भ्याड आणि प्रणघातक हल्ल्याला पंधरा दिवस उलटुन गेले तरी पोलीस प्रशासनला या गुन्ह्यातील आरोपींना पकडण्या...
No comments:
Post a Comment