सभोताली जे घडतय ते विपरीत आणि अस्वस्थ करणार आहे, पण जे घडतयं ते आसच घडू द्यायच की त्यात काही बदल करायचा हा निर्णय सर्वस्वी तुमचा. अवतीभोवती घडनार्या घटनांवर मला जे सुचलं ते बेधडक आणि रोखठोक तुमच्या समोर मांडल आहे. याचे परीनाम काही होवो, त्याची पर्वा मी कधी केली नाही आणि या पुढे ही करनार नाही .
Tuesday 28 August 2012
पुण्यातली बेफाम तरूणाई...
आज पुण्यातली अल्पवयीन मुलांची मद्यपार्टी ची बातमी पाहीली आणि अचंबिंत झालो.आभ्यास आणि शिक्षणनाच्या मुख्य टप्यावर ही तरुनपीढी आशी बेधुंद पणे वागत आसेल तर उद्याच्या भारता साठी ही धोक्याची घंटा आहे, आणी आश्या मद्यपी पार्ट्यना या नव्या पीढीने हजेरी लावने हि नक्कीच सामाजिक अधोगतीची नांदी आहे . वयाच्या 15 व्या वर्षा पासुन आजची नविन पिढी व्यसनाधिनते कडे वळते आहे किंबहुना आज त्यांवर कोणाचाही दबाव राहीला नाही. ही पिढी पालकांना जुमानत नाही शिक्षकांचा मान राखत नाही . थोडक्यात स्वकेंद्रीत झालेली हि पिढी आय्याशी आणि व्यासनाधिनतेच्या अहारी जात आहे, पण यामगची थोडी पार्श्वभुमि पण आपल्याला लक्षात घ्यावी लागेल. पुर्वीच्याकाळी एकत्र कुटुंब प्रणाली अस्तिवात होती त्या मुळे संस्काराची एक मोठी शिदोरी एका पिढी कडुन दुसर्या पिढी कडे हस्तांतरीत होत होती. आता 21व्या शतकात विभक्त कुटुंब प्रणाली आली आणि इथेच गोची झाली, आई बाप दिवस भर नोकरी धंद्यासाठी नाइलाजाने घराबाहेर आसतात. त्यातच आपल्या मुला मुलींना काही कमी पडु नये म्हणुन टिव्ही इंटरनेट यांची चोख व्यवस्था घरी केली जाते. आणि याच मध्यमांतुन बाहेर कलीयुगाचा जो थयथयाट सुरु आहे तो तुमच्या आमच्या घरात राजेरोस फिरत आहे. यातुनच रेव्ह पार्ट्या मद्यपी हुक्का पार्ट्यची निमंत्रने आपल्या पाल्याना घरपोच मिळत आहेत. अभ्यासाचे आणि शाळेचे काही काही तास सोडले तर बाकीच्या वेळेत आपला पाल्य करतोय काय ? याचा कधी पालकांनी विचार केलाय काय ? फेसुबुक, युट्युब, सारख्या सोशल नेटवर्कीन साईट वर आपला पाल्य कोणते दिवे लावतो. त्याच्या मित्र वर्गात कोण कोण आहेत ह्या वर कधी पालकांच कधी लक्ष्य दिलय का ? आज शाळा काँलेजातुन संस्कार देने तर बंद झाले आहे . आणि पालकांन कडे वेळ नसल्या मुळे आजची नवी पिढी भरकटच चालली आहे . पर्यायाने 21व्या शतकात पाश्चिमात्य संस्कृती आमच्या संस्कूतीला डोईजड होत आहे . त्यातुनच टिव्ही इंटरनेट च्या माध्यमातुन पाश्चिमत्य संस्कृतीचा जो काही प्रचार सुरु आहे तो नक्कीच आपल्या संस्कृतीला मारक ठरतो यात शंका नाही . आजची नवी पिढी एका प्रचंड असुरक्षित आणी प्रचंड दबावा खाली जगत आहे वाढती स्पर्धाचा सामना करत आसतांना त्यांचा संवाद कुठे तरी हरवला आहे. प्रत्येक पालकाचा आपल्या आपल्या पाल्याशी संवाद वाढवला तर भविष्यात आसे प्रकार घडनार नाही आशी आशा वाटते. �
Location : Manas Mandir Jain Rd, Asangaon, Maharashtra,
Tuesday 14 August 2012
हे कसले स्वातंत्र्य ?
आजचा दिवस तसा गोड छत्रपती शिवप्रभुच्या जाज्वंल्य आणि प्रेरणादायी इतिहास आम्हा तमाम भारतीयांना नेहमीच प्रेरणा देतो पण छत्रपतींच्या आणि शंभुराजांच्या निर्वाना नंतर हा इतिहास कोणी गंभिरतेने घेतला नाही आणि हिंदवी स्वराज्याची पडझड सुरु झाली. अखंड हिंदुस्थान मानबिंदु आसलेल्या भगव्या जरीपताक्याते तेज कमी होत गेले, मोघलाई संपली, आणि इंग्रजांची एकहाती सत्ता संपुर्ण भारतावर प्रस्थापित झाली आणि आपण गुलामी स्विकारली, आसे का घडले ? याच विचार केला तर प्रामुख्याने एक कारण समोर येते, गुलामी आपल्या रक्तारक्तात भिनली आहे . छत्रपती शिवाजी महाराजांन सारखा एखादा युगपुरुष आपल्या अदम्य साहस शैर्य राजकारण आशा आनेक गुणसंपत्ते मुळे आपल्याला गूलामगिरीतुन मुक्त करतो, पण, (छत्रपती सारखा वीर क्वचितच जन्माला येतो हे आपण आता विसरलो आहोत)या नंतर दूर्देवाने आसा युग पुरूष अजुन झाला नाही , आणि होनार नाही. यांनंतर इंग्रजाविरुध्द दिडशे वर्षाच्या संघर्षा नंतर कुठे आपल्याला स्वंतंत्र्याची शिदोरी मिळाली ती आजमिती पर्यत शाबुत आहे .आसो स्वंतंत्र्य मिळुन आज 66 वर्ष झाली तरी देशाच्या परिस्थितीत मात्र काही सुधारना झाली नाही. शहर वाढली, औद्योगिक क्रांती, हरित क्रांती झाली,व्यापार वाढला तरी गरीबी मात्र तशीच राहीली. आजची आणि स्वतंत्र्यपुर्व परिस्थिती काही वेगळी नाही. आज आम्ही स्वंतंत्र्य आहोत, पण गुलामीच्या बेड्या अजुन आमच्या पायात तश्याच आहेत. घटने आम्हाला स्वंतंत्र्य दिलयं पण अम्हाला ते उपभोगता येत नाही. आज हि आपण गुलामच आहोत . मुठभर नेंत्याचे सरकारी बाबुचे आणि भष्ट्रसमाज प्रवृत्तीचे !!
देशात आज आराजक माजलंय असंतोषाचा सुप्त लाव्हा दबा धरुन बसलाय, हा लाव्हा कधी उफाळुन येईल याचा नेम नाही. आण्णा आसो किंवा बाबा आसो भष्ट्राचार निर्मुलना साठी जंग पछाडतात तिकडे सरकार भ्रष्ट्राचार्याना संरंक्षण देते. माहागाई राक्षसाने तर सर्वत्र हाहाकार माजवललाय, त्यात अतंर्गत अपासातील वाद आलेच . शेतकरी हवालदिल आहे. भांडवदांरांची मोठी चलती सुरु आहे. आसाम दंगली मध्ये होरपळतोय, सरकार कडुन बांग्लादेशी मुस्लिमांचा पाहुनचार जोरात सुरु आहे . रुपया डबघाईला आलाय, आणि काँग्रेस सरकार सोनियामय झालय.सरकार चालवायला लाचार,नामर्द, नादान, नेंत्यांची मोठी मागणी आहे . एकंदरीत आज देश मोठ्या अराजकतेच्या तोंडावर उभा आहे . ज्या दिवशी देशात सर्वत्र पसरलेल्या अंसंतोषाचा स्फोट होईल तेव्हा काय घडेल याची कल्पना न केलेलीच बरी किंबहुना आजची परिस्थिती कोणत्याही भारतीयला भुषनावह ठरेल आशी नाही नाही.
देशाची लोकसंख्या बरोबर भ्रष्ट्रचार आणि घोटाळे झपाट्याने वाढत आहेत यामुळे देशाची एकुनच अर्थव्यवस्था खिळखिळी होवुन देशाच्या विकासालाच मोठी खिळ बसली आहे. गरीबी बेरोजगारी मुळे देशात गुन्हेगारीच प्रमाण वाढत चालले आहे. देशाचा कणा आसलेला तरुणवर्ग अय्याशी आणि व्यसनाधित होतोय आणि नंतर भ्रष्ट्राचारी नेत्याचा शरणना धिन होत चालाल आहे ,आणी यातच भष्ट्राचारी नेत्याच फावलं आहे. एकंदरीतच भ्रष्ट्राचार्यानी देशाची बट्ट्याबोळ केला आहे .आसले नादान नेते आमच्या नशिबी आले या पेक्षा आधिक दुर्देव कोणते? आसो देशगाडा चालला आहे तो चालु द्या.गेंड्याच कातडी प्रमाणे जाड आसलेल्या नेत्यांच्या आणि जनतेच्या कानावर आमचा टाहो कधीच पोचनार नाही, आणि पोचला तरी त्याचा काही उपयोग होणार नाही.आमच्या लेखल्या झिजतील पण भ्रष्ट्राचारी नेंत्याचे हात काही झडनार नाहीत. देश जसा चाललात तसाच चालत राहील. अराजकते हा प्रवास कधी संपेल सांगता येत नाही पण नवं काही घडेल आशी आशा आहे, पुन्हा एकदा भारत सुजलाम सुफलाम होण्यासाठी क्रांन्ती झालीच पाहिजेत.आमचं स्वंतंत्र्य आज भ्रष्ट्रराज्यव्यवस्थेने आणि भ्रष्ट्र प्रवृत्तीनी हिरवुन घेन्याचा कुटील डाव टाकला आहे पण त्यांचा डाव त्यांच्यावरच उलटवुन त्यांना याच मातीत गाडल्या शिवाय भारतीय शांत बसनार नाही .ज्या दिवशी देशातली भ्रष्ट्रराज्यव्यवस्था आणि भ्रष्ट्रप्रवृत्तीचा समुळ नाश होईल त्याच दिवशी भारताचे स्वांतंत्र्य लैकिकार्थाने चिरायु होईल यात शंका नाही.
.
जय हिंद ! जय भारत !!
Saturday 4 August 2012
मनसे टोलधाडीचे वास्तव..
मा. राजसाहेब ठाकरे यांनी पत्रकार परिषदेत
अभ्यासपूर्ण रीतीने मांडलेले मुद्दे
-------------------------------------------------------
दिनांक - २४ जुलै, २०१२
महाराष्ट्र राज्यामध्ये पथकर वसुलीबाबत लोकांमध्ये
खूप मोठा संभ्रम असल्यामुळे महाराष्ट्र नवनिर्माण
सेनेने राज्यातील काही पथकर नाक्यांवर १४ दिवस
पाहणी केली.
ह्या पाहणीचे उद्देश पुढीलप्रमाणे होतेः
१. त्या पथकर नाक्यांवरून कुठल्या प्रकारची,
किती वाहने दररोज ये-जा करतात
आणि ती किती पथकर देतात ते पाहणे.
२. पथकर वसूल
करण्याच्या व्यवस्थापनाचा आणि प्रशासनाचा अभ्यास
करणे,
३. पथकर घेतल्यावर जनतेला कोणत्या सोयी-
सुविधा-सवलती दिल्या जातात ह्याचे निरीक्षण
करणे.
ही पाहणी राज्यात एकूण ४० ठिकाणी सुमारे १०,०००
जणांनी केली. ही करण्याअगोदर
त्यांना माहिती संकलन करण्याचा मसुदा देण्यात
आला होता.
ह्या एकूणच कारभारत पारदर्शकता नाही,
लोकांची लूट चालू आहे आणि लोकांना ज्या सोयी-
सुविधा-सवलती मिळायला पाहिजेत त्या मिळत नाहीत
हे लक्षात आले.
त्याची काही उदाहरणे देत आहोत.
मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील तसेच जुन्या राष्ट्रीय
महामार्गावरील पथकर वसुली -
वसुलीची सुरुवातः २००४
कारणः जुन्या रस्त्याचे रूंदीकरण,
द्रुतगती मार्गाची देखभाल
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पाहणीप्रमाणे
द्रुतगती मार्गावरील (खालापूर) पथकर नाक्यावर
रोजचे सरासरी किमान १ कोटी ७५ लाख रुपये वसूल
होतात असे दिसले.
म्हणजे ह्या वर्षीची वसुली ६३८.७५ कोटी रुपये.
अधिक
जुन्या मार्गावरील रोजची सरासरी वसुली साधारण ४५
लाख म्हणजे वर्षाला १६४.२५ कोटी
एकूण ८०३ कोटी रुपये ह्याच
वर्षी वसूलव्हायला हवेत.
ह्या हिशेबाने (दर वर्षी ५% वाढ वाहनसंख्येत
झाल्याचे धरून) ह्या वर्षी अखेर ५,९१५.८६
कोटी रुपये जमा व्हायला हवेत.
आमच्या माहितीनुसार ह्यावरचा खर्च १३०१.६४
कोटी रुपये झाला आहे. मग अजूनही वसुली का चालू
आहे ?
वसुली किती दिवस चालणार आहे ?
दुसरे उदाहरण - मुंबईत येताना लागणारे पाच पथकर
नाके -
ह्यांची सर्वांची मिळून रोजची सरासरीवसुली आहेः १
कोटी ३७ लाख ८१ हजार ८५३ रुपये.
हिशेबासाठी ही रक्कम ह्यापेक्षा कमी म्हणजे
दिवसाला १.२५ कोटी रुपये धरली तरी २०१२
ह्या एकाच वर्षात ४५६.२५ कोटी रुपये जमा होणार
आहेत. असे असेल तर आजपर्यंत ३९३४.६४ कोटी
रुपये जमा झाले असावेत, आणि हे असेच चालू राहिले
तर २०२७ पर्यंत १४,५२४.७९ कोटी रुपये
जमा करण्याचा विचार दिसतो आहे.
ह्या कामासाठी २५२७.५० कोटी रुपयांचे कंत्राट दिले
गेल आहे अशी आमची माहितीआहे. तसेच असेल तर
हे पैसे कधीच जमा झाले आहेत. मग पुन्हा टोल
वसुली कशासाठी ? किती दिवस ?
ही फक्त दोन उदाहरणे. मग महाराष्ट्रातएकूण काय
चित्र असेल ?
लोकल ते ग्लोबल दहिहंडी..
लहानपणी साजरे केलेले सनवार आता आठवले की मला मोठी गंमतच वाटते. त्यावेळी शाळेचा अभ्यास तसा थोडाच कमीच आसायचा आणि हल्लीच्या ट्युशनच तेव्हा फँड ...
-
लहानपणी साजरे केलेले सनवार आता आठवले की मला मोठी गंमतच वाटते. त्यावेळी शाळेचा अभ्यास तसा थोडाच कमीच आसायचा आणि हल्लीच्या ट्युशनच तेव्हा फँड ...
-
✍🏻 प्रशांत गडगे संपादक-सा. विचारमंथन नुकताच निवडनुक आयोगाने पत्रकार परीषद घेवुन महाराष्ट्रात विधानसभा निवडनुकीचा कार्यक्रम जाहिर केला...
-
निवडनुकीच्या तोंडावर आलेला प्रजासत्ताक दिन या देशातील राजकारन्यासाठी प्रचाराची आणि आपले बेगडी देश प्रेम व्यक्त करन्याची सुवर्ण संधी आहे अस म...