Friday 23 March 2012

बालपणीचा पाडवा.....

आज चैत्र शुध्द प्रतिपदा आर्थात गुढी पाडवा आम्हा तमाम हिंदु चा नववर्षाचा पहिला दिवस. भल्या पहाटे उठुन सकाळी अंनंदाची भरभराटीचा चढता आलेख दाखवनारी यशाची भव्य गुढी आपण दारात बांधतो. गोडधोड निवैद्य दाखवुन नंतर आपल्या दिनचार्यला सुरुवात करतो, पण गेल्या काही वर्षापासुन आपला कोणताही सन साजरा करतांना पहिंल्यांदा आठवते ते बालपन !! लहान होतो तेव्हा काय धम्माल आसायची या सनांमध्ये आणि आता फक्त उरलेय ती फक्त औपचारीकता ? त्या वेळी सगळ्याच सनांना एक वलय होत , मग ती दिवाळी दसरा आसो की होळी रंगपंचमी आसो नवरात्र आसो की गणपती नुसती धम्माल आसायची. आता ती मौज मजा कुठे पाहायलाच मिळत नाही. आसो तो भाग वेगळा , पण गेल्या काही दशकात देशाच्या संस्कृतीत बदल घडत आहेत , टिव्ही इंटरनेट माध्यमान मध्ये बालपण कुठे तरी हरवत चालल्याचा भास होतोय..
.
आम्ही जेव्हा लहान होतो तेव्हा होळीच्या पाच दिवस आधी होळी पेटवायचो अर्थात तेव्हा आईचा ही मोठा पांढीबा आसायचा गावात बोंबा मारन्या पासुन लाकडे चोरन्या पर्यत सगळी धम्माल. गुढी पाडव्याचा दिवस म्हणजे पाटीपुजन किंवा सरस्वती पुजन मग त्याला फुले आनण्या पासुन तर पाटीवर सरस्वतीची चित्र काढन्या पर्यतची धडपड न सांगीतलेलीचा बरी त्या नंतर धुळवड रंगपंचमी गुढीपाडवा गोकुळआष्टमी हंडी दिवाळी दसरा गणपती नवरात्र या संनाना कैफ काही निराळाच, सगळ काही भारावुन टाकनार वातावरन संपुर्ण ठिकानी पाहायला मिळायचे पण त्याच बरोबर मोठे पण लाहानग्यात मिळुन मिसळुन सगळेच सन मोठ्या अंनंदाने साजरे व्हावचे खरचं कीती जादुयी दिवस होते ते आज आचानक आठवले म्हणुनच हा लेख प्रपंच .
.
आज सन फक्त औपचारीकता म्हणुन साजरे केले जातात याचाच प्रत्यय येतोव याच्या मागची नक्की कारने काय आसतील याचा विचार केला तर तर एकच उत्तर सुचतयं हे दळभद्री सरकार आणि चंगळवादी आणि स्वर्थी नितीमत्ता. दिवसेंनदिवस महागाईच्या भ्रष्ट्राचाराच्या नव नविन मोठ्या गुढ्या उभारन्यात सरकार मशगुल आहे आणि आम्ही त्या गुढ्या ना हातभार लावन्यात कधी कधी तर राग अनावर होतो त्याच गुढ्या च्या बांबुनी सरकारला आणि भ्रष्ट्राचार्याना फोडुन काढून त्यांच गुढीला उलट टांगव पण हातबल आहोत . आसो तुम्ही पण सन साजरेच केले आसतील ते दिवस आठवा आणि आत्ताचे काय फरक आहे तो लगेच कळायचा ? त्या वेळी घरात पैसा नसायचा पण सुख खुप आसायच आता नेमक उलट झालंय पैसा आहे पण सुख नाही त्या मुळेच संस्कार देन्यात आपण कमी पडतोय , महागाई वाढलेय महिनाभर राबुन पण शेवटी हातात काहीच उरत नाही तणाव वाढतोय स्पर्धा वाढतेय मग त्यात कसले आले सनवार. आसो आजचा दिवस नव चैतन्याचा, आनंदाचा भरभराटीचा, आश्या मंगलदिनी काय कोणाला शिव्या शाप द्यायचे ? पण दळभद्री सरकारने हे समजुन घ्यायला पाहीजेत कित्तेक कुंटुबांची वाढत्या माहागाई मुळे होनारी कुंचबना पाहावत नाही. दरवर्षी आनेक सन येतात आणी जातात आपल्यात नवी उमेद काय येत नाही. आली तरी ती क्षणभंगुर !!
.
चैतन्याच्या आणी अंनंदाच्या या सनाला कोणाची दृष्ट न लागो तुमचा अंनंद आसाच द्विगुणी होवो गुढी पाडव्याच्या आणि नववर्षाच्या सर्व वाचकांना अंनंदमयी शुभेच्छा ।।

Monday 19 March 2012

भ्रष्ट्राचार आणि मी.......

गेल्या चार पाच वर्षात कधी नव्हे तेवढी भ्रष्ट्राचाराची प्रकरने एका मागोमाग एखाद्या फटाक्याच्या माळे सारखी फुटत गेली आणि या भ्रष्ट्राचाराचा आवाजाने सगळ्याच सर्वसामान्य जनतेच्या कानठळ्या बसल्या , त्यात मग टु जी स्पेट्रम आसो राष्ट्रकुल, खाण घोटाळा आसो किंवा कालपरवाच अटक झालेले कोणी आपीएस आधिकारी आसो, आकडे ऐकले तर भुवळ येईल एखाद्याला, 200 कोटी च्या पुढेच सगळे ,ऐवढा पैसा कसा येतो यांच्या हातात, आज दोनशे रु. कमताना दमछाक होते इथे आणि हे मंत्री आधिकारी करोडो रु. बेहिशोबी मालमत्त कशी कमवतात याच आश्चर्य वाटतयं मला आसो तो भाग वेगळा पण या भ्रष्ट्राचाराच्या प्रकरणांनी झोप उडालेय सर्वसामान्यांची हे मात्र खर , गल्लीतल्या चिरीमिरी पासुन या भ्रष्ट्राचाराला सुरवात होते ती थेट दिल्लीत मंत्रालयात जावुन पोचते , ट्राँफीक सिग्नल वरची दाहा विस रुपयाची ची चिरी मिरी आसो किवां संसदेतलं लाच प्रकरन आसो भ्रष्ट्राचार ने कुठली पातळी गाठलेय याचा अंदाज आता तुम्हाला आला आसेल.

पण भ्रष्ट्राचार वाढवायला खरा जबाबदार कोण आहे , तुम्ही अम्हीच ना ? लायसन काढायला, पोरांची अँडमिशन्स करायला, ट्राफिक हवदारला, दाखले बनवायला, किंवा आपले कुठले ही सरकारी काम लवकर उरकुन घेन्यासाठी आपण चिरीमिरी देतोच ना ? इथुनच तर सुरुवात झाली भष्ट्राचाराला आणि त्याचा शेवट मंत्रालयात होते. कारण इथे लाच घेने गुन्हा आहे पण लाच देने नाही आणि हिच गोम आहे लाच घेनारे पकडले गेले पण प्रत्येक ठीकानी लाच देनारे आहेत त्याच काय ? मग कसा संपनार या देशातला भ्रष्ट्राचार !! फक्त बोँबा मारुन काही होनार नाही किंवा आण्णाच्या अंदोलनाला पांढीबा देवुन सुध्दा यात काडीचा हि फरक पडनार नाही. कारण पायाच कमकुवत आसेल तर इमारत उभीच कशी राहील तुम्ही आम्ही चिरीमिरी द्यायची बंद करु तेव्हाच तर एक नवी सुरवात होईल. आता प्रत्येक जन विचार करत आसेल मीच सुरवात का करू ? आणि इथेच माशी शिंकली ! म्हणुनच अजुन पर्यत हि सुरवात झाली नाही आणि या पुढे होनार पण नाही, हाच भ्रष्ट्राचार बकासुरा सारखा रोज रोज वाढत जाईन आणि एकदिवस तो आपल्याच पुढच्या पिठ्या खावुन टाकील यात शंका नाही.

या चिरीमिरीनेच आज देश विकला जातोय. जन्माला येनार्या मुलाचा जन्मदाखला लाच दिल्या शिवाय मिळत नाही आणि मुत्यृ झालेल्या व्याक्तीचा मृत्यु दाखला ही लाच दिल्या शिवाय मिळत नाही या पेक्षा मोठी ती शोकांतीका ती कुठली, दुर्देवानेच भ्रष्ट्राचार इथे शिष्टाचार झालाय काँलेज ला जानारा एक युवक पण आज बिना परवाना बाईक चालवायला घाबरत नाही का ? तर विस रु दिल्यावर कुठलाही ट्रँफीक हवलदार तुम्हाला लगेच सोडतोय. लाच देन्या आणि घेन्याची हिच प्रवृत्ती देशाला विघातक आहे . आज तुम्ही आम्हालाच कायद्याचा धाक नाही तर मंत्री आधिकारी कशाला घाबरतील कायद्याला, पैश्याच्या जोरावर आज या देशात काहीही होतय ! तुम्ही काय त्यांच वाकड करनार आहेत आणि अगदी आसचं घडतय ना ? कुठे गेला तो तेलगु , राजा , कलमाडी अजय कुमार कृपाशंकर आहे काही लक्षात काय वाकड केल आपण यांच या देशात , आण्णा ओरडुन ओरडुन थकले काय झालं जनलोकपालच ? सगळ्या संवेदना मेल्यात आपल्या स्वर्थी पणा पुढे पंगु झालोय आपण . पुढे काय करायच माहित नाही निवडनुका आल्या मत द्या नाहितर विका, सरकार काय करतय ? देनघेन नाही , पेट्रोल डिझेल वाढलयं ठीक आहे , सगळं काही बिनभरवशी चालु द्या ? पण शिस्त नावाची एक वस्तु आसते, तुम्ही आम्ही ती पाळलीच पाहिजे तरच हे मस्तवाल मग्रुर आधिकारी मंत्री वठनीवर येतील. आज आपणच ठरवलं लाच द्यायची नाही कायद्याला बगल देवुन कोणतेही काम करायच नाही हो मला माहितेय हे अवघड आहे पण शक्य आहे प्रयत्न तर करुन बघा, आज आपल्याला शिस्त लागली तर घरातले इतर ही सदस्य तिच अनुकरन करतील ना ? आपण बदललो की समाजही बदले ट्राय करायला काय हरकत आहे ! आज आपण सुरुवात नाही केली तर कदाचीत पुढच्या पिठ्या पण आश्याच वागतील लाच द्या लाच घ्या निर्लज्य पणे या पाट्या जागो जागी दिसतील आणि त्या वेळची परिस्थिती किती भयान आसेल याची कल्पनाच न केलेली बरी, या गेंड्याच्या कातडीच्या आणि सुस्तावले ल्या सरकार कडुन भ्रष्ट्राचार निर्मूलनाची काहिच अपेक्षा नाही. म्हणुन थेट तुम्हाला साद घातली, पटल तर घ्या नाही तर चालु द्या !!

Monday 5 March 2012

लोकशाहीचा शिमगा...

शिमगा जसा जसा जवळ येते तस तशी नवनवीन सोंग आपल्या आवती भवती पाहायला मिळतात आत्ताच महापलिकेचा शिमगा झाला,पण महापौर निवड न झाल्या मुळे ज्या काही ज्या काही राजकीय बोंबा मारल्या जातात त्यामुळे सर्वसामान्य तर पुरती हैरान झाली आहे, नगरसेवकांच्या पळवापळवी आसो किंवा घोडेबाजार आसो आरोप आसो वा प्रत्यारोप एकुनच भारतातील राजकारणाचे चित्र विचित्र झाल्याच पाहायला मिळते. कलमाडी राष्ट्रकुल घोटाळ्यातुन बाहेर येताच न येताच तोच काँग्रेस फुकाशंकर तुरंगाची हवा खायला तयारच आहेत. करोडो रुपयांचे घोटाळे करनारे सगळेच नेते चार पाच महिन्यांचा तुरंग मुक्काम करुन छाती काढुन पुन्हा रस्त्यावर फिरतांना दिसत आहेत, आणि जनता हतबलतेने हे सगळ पाहत बसली आहे . कुठे चालीये आपल्या देशाची लोकशाही ? लोकशाहीच्या नावावर सगळ्या देशात झुंडशाही माजली आहे तरी आम्ही या लोकशाहीचा टेंभा जगात आभिमाने मिरवत आहोत . संसद न्यायपालिका प्रशासन आणि वृत्तपत्रे ह्या लोकशाहीच्या चारही स्तंभाना भ्रष्टाचाराने पोखरले आहे .एक दिवस लोकमताचा प्रकोप लोकशाहीचा हा डोलारा कधी कोसळेल याचा नेम नाही. जिकडे बघावा तिकडे भ्रष्टाचार बोकाळलेला दिसतो. फुकाशंकर सारख्या एका भाजी विक्री करनारा आज करोडो रु . कमवतोय याचा अर्थ काय समजायचा ? सरकार मधील नेते अघोषित सावकार बनले आहे उठ सुट कोणी ही येतय सरकारी तिजोरीवर डल्ला मारुन प्रचंड पैसा कमवतोय आणी जनता आपली कर भरुन आधीच बेजार आहे आणि त्यात माहागाई रोजच वाढतेच आहे. तिकडे आण्णा हजारेनी भ्रष्ट्राचारच्या मुद्द्यावर चांगलेच वातावरण पेटवले होते आणि त्यालाही ग्रहण लागले केजरीवाल बेदी भुषन सारखी सगळेच सहकारी भ्रष्टाचारच्या आरोपांन मध्ये अडकले. आण्णासारख्या स्वच्छ चरित्राची शंभर माणसे या आब्जावधी लोकसंखेत नेऋत्व करायला मिळने कठीन होवुन बसलयं म्हणजे या देशात भ्रष्टाचारने कोणती पातळी गाठलेय याचा अंदाज आलाच आसेल, कोण काय बोलतो कोण काय ऐकतो याच कोणाच कोणाला काय ठाव ठिकाना नाही त्यातच पुढे बजेट आलच आहे ? किती करवाढ होते या चिंता सर्वसामान्याना पडलीच आसो पेट्रोल डिझेलचे भाव तर आता महीन्याला वाढायला लागले आहेत. आसो देशात सर्वत्र शिमगा सुरु आहे कुठे निवडनुकांचा तर कुठे महापौर निवडीचा कुठे क्रिक्रेट चा यात आमचे पंतप्रधान आणि आमची सोनिया कुठे मुग गिळुन बसली आहे हे त्यांच त्यांना ठावुक? आसो या देशात काँग्रेस जेव्हा पासुन सत्तेत आली आहे तेव्हा पासुन जनता फक्त शिमग्याचा बोबांच मारीत आहे. कधी भ्रष्ट्राचारच्या नावाने कधी माहगाईच्या नावाने तर कधी विकासाच्या नावाने कधी एकदाची या काँग्रेसची होळी होते आणी या देशातली जनता सुटकेचा श्वास घेते हे आता दैवालाच ठावुक.......!!

लोकल ते ग्लोबल दहिहंडी..

लहानपणी साजरे केलेले सनवार आता आठवले की मला मोठी गंमतच वाटते. त्यावेळी शाळेचा अभ्यास तसा थोडाच कमीच आसायचा आणि हल्लीच्या ट्युशनच तेव्हा फँड ...