Wednesday 28 December 2011

आण्णांच्या आंदोलनाची दशा आणी दिशा ?

.
गेल्या वर्षभरा पासुन अण्णाचे जनलोकपाल विधयका साठी अंदोलन सुरु होते सुरवातीला मी हि या अंदोलनात सक्रीय सहभाग नोंदवला कारण एकच भ्रष्ट्राचारा विषयी मनात असलेली चिड आणि एका मराठी माणसाच्या अंदोलनाला देशभरातुन ऐवढा प्रचंड पांढीबा मिळत आसतांना आपण शांत का? या नंतर जन लोकपालची पुर्ण माहिती घेतली आणी त्याच वेळी खात्री झाली की सरकार जनलोकपाल संसदेत सहजा सहज मांडनार नाही. त्यानंतर 16 आँगस्ट च्या अदोलनाला मिळालेला पांढीबा आणि सरकारची झालेली कोंडी पाहता खरच या देशातली सगळीच जनता भ्रष्ट्राचाराला वैतागली आहे.आणि जनतेला काँग्रेस सरकारला जो संदेश पोचवायचा होता तो अण्णाच्या मार्फत जनतेने अतिशय योग्य पध्दतीने पोचवला होता. आणि त्याचा धसका सरकारने चांगलाच घेतला, त्या नंतर शहा कटशाहचं राजकारण सुरु झाले टिम आण्णाच(फक्त अण्णा सोडुन) च्या अंगातले काही सुप्त गुण एक एक करुन जनते समोर येवु लागले .अर्थात आँगस्ट मधील अंदोलन विजयाची हवा टिम अण्णाच्या डोक्यात घुसत चालल्याची शंका मनात येवु लागली. जी गोष्ट नको होती तीच गोष्ट प्रकर्षाने जाणवु लागली, मग या मध्ये केजरवाल किरण बेदी वर झालेले भ्रष्ट्राचाराचे आरोपांवर टिम अण्णांनी दिलेली प्रतिक्रीया किंवा प्रशांत भुषन चे काश्मिर विषयी बेताल वक्तव्य असो किंवा अण्णाच्या ब्लांग वरुन राजु परुळेकरशी झालेला वाद आसो किंवा शरद पवारान वर झालेल्या हल्ल्याचे अनावधाने आण्णा कडुन झालेले सर्मथन आसो, प्रसिध्दी माध्यमांना दिलेले अवास्तव महत्व आसो, दुर्देवाने या सगळ्या घटना काँग्रेस ला फायदा देनार्या ठरल्या यात शंका नाही.
.
जनलोकपालच्या अंदोलना लोकाबरोबरच प्रसिध्दि खुप मोलाचा वाटा आहे हे टाळुन जमनार नाही त्यांनी या अदोलनाला ग्लोबल बनवल पण ग्रामीन भागातल्या जनते पर्यत पोचन त्यांना शक्य झाल नाही हे ही तेवढच सत्य आहे. त्यांनतर पुन्हा आण्णानी जंतर मंतर वर एक दिवसाच्या लक्षणिय उपोषन केले आणि तेव्हाच भाजप आणि इतर राजकिय पक्षानी या कायद्याला जाहिर पांढीबा दिला आणि आंदोलनाच्या वाढत्या दबावा पुढे झुकुन काँग्रेस सरकारने जन लोकपाल काहि अंशी संमातर लोकपाल नावाचा अतिशय घाईत काल परवाच संसदेत चर्चे साठी आनला आणि याच वेळी अण्णानी पुन्हा जन लोकपाल मागणी साठी मुंबईत उपोषनाला बसले आर्थात घटनाक्रम सांगन्याचा उद्देश येवढाच की एखादी चळवळ जेव्हा सुरु होते तेंव्हा तिच्या कडे पाहण्याचा लोकमानसाचा दृष्टीकोण वेगळा असतो ,पण ती चळवळ जेव्हा मध्यावर पोचते तेव्हा तिच्यातल्या गुण आणि दोषाचे जाणिव लोकमानसाला होते, आणि याच लोकमानसाची सुरवाती येवढीच अपुलकी चळवळी शेवटा पर्यत पोचलीच तर ती चळवळ यशस्वी होते अस माझ स्पष्ट मत आहे. जनलोकपाल संसदेत जरुर आला आसता अण्णांनी उतावळे पणा न करता थोडी संयमी भुमिका घेणे अवश्यक होते.ती आण्णानी घेतली नाही आणि सर्वात महत्वाची बाब म्हणजे नेता कमी आणि आनुयायी जास्त बोलायला लागले तर लोंकांची आंदोलना वरची निष्ठा कमी होते. आणि ह्याच गोष्टी भान टिम आण्णांना उरलं नाही.
.
या नंतर संसदेत जी चर्चा झाली खरोखर ती खुप गंभिर होती राजकारण म्हणजे बेआक्कल आणि बेजबाबदार हा जो सर्वसामान्या मध्ये न्युगंड निर्माण झाला होता त्याला काही अंशी छेद देनारी भाषणे या निमित्ताने ऐकाला मिळाली. तर आसो सरकारणे आणलेले लोकपाल बिल भारताच्या सर्वोच्या संसदेने मंजुर केले, काही आसो पण आण्णाच्या आंदोलना मुळे संसदेत लोकपाल कायदा मंजुर झाला याच सर्व श्रेय आण्णान द्यावे लागेल यात तिळमात्र शंका नाही. आण्णा तुमचं आंदोलन आगदी योग्य दिशेला सुरु होत भले मध्ये मध्ये थोड भरकटतं असो आता तर तुम्ही काँग्रेस विरुध्द दोन हात करन्याची घोषना केली आहे . खरोखर ती प्रशंसनीय आहे समोरचा जेव्हा लढायला आपल्या मैदाना येत नाही त्या वेळी नक्कीच आल्याला त्याच्या मैदानात जावे लागते. आणी तुम्ही आता राजकीय मैदानात काँग्रेशी दोन हात करनार आहात यात आम्हाला अंनंदच आहे, तुम्हाला जनलोकपाल अंदोलनात आलेले यश जरी कमी वाटतं आसले तरी आमच्या दृष्ट्रीने खुप आहे निदान भ्रष्ट्राचारा विरोधात सरकारी पातळी वर सुरुवात तरी झाली. फक्त एकच विंनंती आहे विजयाचा हवा डोक्यात जावु देवु नका आणी प्रसिध्दि माध्यमांनवर आजिबात विश्वास ठेवु नका, लक्ष्यात ठेवा पाडन्या साठीच हे तुम्हाला डोक्यावर घेतात.. आता पर्यत ज्या हिंम्मतीने लढलात तसेच कायम लढत राहा देशातली जनता नक्कीच तुमच्या सोबत आहे.


प्रशांत गडगे

Wednesday 21 December 2011

"भारतरत्न" कोणासाठी ??

भारतरत्न म्हणजे देशातील सर्वोच्च नागरी सन्मान गेली आता हा सन्मान देशाने कोणाला द्यावा की देवु नये ऐवढे सांगन्या इतपत तरी मी मोठा नाही. पण गेल्या काही वर्षा पासुन सचिन तेंडुकरला क्रिडाक्षेत्रातील भक्कम कामगिरी बद्दल हा सन्मान द्यावा हि मागनी जोर धरीत होती पण क्रिडाक्षेत्रातील कामगीरी बाबत कोणती तरतुद या सन्मानाच्या नियमावलीत नसल्या कारणाने हा विषय लांबनीवर पडला होता पण आता या सन्मानाच्या नियामावलीत तशी तरतुद करुन क्रिडाक्षेत्रातील आणि चित्रपट भक्कम कामगिरी करनार्या खेळाडुना आताभारतरत्न किताब बहाल करता येनार आहे पण मुळ हा मुद्दा की खेळ हे मनोरंजनाचे साधन आहे. पैसा आणि प्रसिध्दी या दोन्ही लयलुट करुन जर भारतरत्न किताब कुणाला मिळत आसेल तर मला मात्र हरकत आहे.
.
खेळांना अताच्या युगात चांगलेच सुगीचे दिवस आले आहेत, कारण म्हणजे ग्लोबलनायझेशन आणि काँरपोरेट यंगीस्थान पीढी प्रत्यक्ष मैदानावर खेळन्या पेक्षा खेळ पाहन्यालाच महत्वदेते, त्यात खेळाचे नवीन नवीन ट्रेंन्ड बाजारात आल्याने खेळ सध्या भलत्याच उंचीवर पोचले आहेत. त्यात राष्ट्रकुल चे कलमाडी, पवार साहेब, दालमिया, ही नावे आपल्या चांगल्याच परीचयाची आहेत तर आसो. मुळ विषयाच कडे वळतो भारतरत्न हा भारताचा सर्वाच्च नागरी सन्मान आहे आणि अत्तापर्यत तो 41 जनांना आदरपुर्वक बहाल करण्यात आला आहे. त्यात साउथ आफ्रिकेचे नेँल्सन मंडेलांचा समावेश आहे. हा सन्मान प्रप्त करण्यार्या मध्ये,
1 धोंडे केशव कर्वे
2 पांडुरंग वामन काळे
3 लाल बहादुर शारत्री
4 डाँ भिमराव अंबेडकर
5 विनोबा भावे
6 जयप्रकाश नारायन
7 मदर तेरेसा
8 अब्दुल कलाम
9 लता मंगेशकर
10 भिमसेन जोशी
.
आशा आनेक गुणी आणि समाजासाठी दिवसरात्र झटनार्या, किंबहुना आपले संपुर्ण जीवनच समाजासाठी अर्पण करनार्या या असामान्य व्यक्ती, मध्ये जर क्रिडा आणि चित्रपट या दोन क्षेत्राचा समावेश झाला तर या यादी मध्ये कुठ कुठली नावे झळकतील हे सुज्ञास न सांगितलेलेच बरे आसो या 41व्यक्तीचे कर्तुत्व त्यांच्या नावावरुनच कळते ऐवढे ते महान होते आणिआहेत ही. त्यांची समाजाविषयी आसलेली तळमळ आणि त्याग पाहुनच, भारतातल्या जनतेने त्यांना हा सर्वोच्य सन्मान त्यांना कृतघ्नपणे बहाल केला. आज दुर्देवाने नियमावलीत बदल करुन
क्रिडा आणि चित्रपट या दोन क्षेत्रांचा समावेश करन्याचा विचार सरकार करीत आहे. या वरुन आपली नितीमत्ता किती खाली येत आहे याच दर्शन जगाला आणी आपल्या पुढच्या पिढीला आपन दाखवत आहोत.
.
क्रिडा आणी चित्रपट यांच्या पार्ट्याचे रंगीत वर्णन आपण पेज 3 वर वाचतोच आहेत. क्रिडाक्षेत्रातील आसो किंवा, चित्रपट क्षेत्रातील आसो, जे काम ते देशासाठी करतात त्याचा त्यांना मोबदला हि दिला जातो, आणि प्रसिद्दी ही... आता सचिन च घ्याना काय कमी आहे सचिन कडे क्रिडा क्षेत्रात त्याची कामगीरी माहानच आहेपण सामाजिक कामगीरीच काय ? उद्या अमिताब भारतरत्न मागेल ? परवा बिपाशा,सौफ आली च नाव कोणी तरी सुचवेल तुम्हाला आम्हाला हे पटनार आहे का ? आर्थात नाही मग सरकार का या उठाठेव करतय कळत हेच कळत नाही.
भारतरत्न किताबाचे पावित्र्य खुप मोठे आहे एका चुकीच्या व्यक्तीच्या समावेशा मुळे या सगळ्या मोठ्या असामीचा आपमान होवु शकतो, त्यामुळे सरकारने ही उठाठेव न केलेलीच बरी ? देशातील विकासकामांकडेच लक्ष द्यावे आणि फक्त सामाजकल्याना साठी आणि देशहित आणि देशाच्या सेवेसाठी( कोणत्याही प्रकारचा मलिदा न खाता)संपुर्ण आयुष्य वेचनार्यानाच हा किताब द्यावा तरच "भारतरत्न" खर्या अर्थाने भारतरत्न राहिल अन्याथा त्याला मातीमोल व्हायला वेळ लागनार नाही.

प्रशांत गडगे .

Saturday 10 December 2011

हा कसला गांधीवाद ??

भारत हा महात्मा गांधी चा देश आहे, मी तर मुळीच हे मानत नाही पण बहुसंख्य गांधीवादी असे म्हणतात, महात्मा गांधी या देशात जन्मले आणि याच देशात बंदुकीच्या गोळ्या खावुन मेले देशप्रेमा साठी किंवा देशहिता साठी तर मुळीच नाही असे मला वाटते अजुन आठ दहा वर्ष जगलेच आसते तर आजुन कोणते दिवे लावले आसते हे त्यांच त्यांनाच ठावुक ,जगातील कुठे नाही पण भारतात त्यांच्या गांधी वादाचा नामजप हा सगळ्याच जास्त प्रमाणात होतो हे हि तेवढच खंर, आसो, या देशात गांधी मुळे गांधीवादाला एक वलय प्राप्त झालय, इथल्या सरकारी कचेरी पासुन तर चलनी नोटे पर्यत गांधीची छबी दिसते, पण त्याच बरोबर जगात गांधीची सर्वाधीक बदनामी विंटबना कुठे होत आसेल तर या देशात का ? इथे आज ज्या काही घटना घडत आहेत त्या गांधीवादात बसतात का ? याच थोडा विचार करा ना ? सत्य, न्याय, आहिंसा, मानवता, हि तत्व देशात गांधीवादी पाळतात का ? गांधीच्या काँग्रेस पक्षा कडुन तरी हि तत्व पाळली जातात?
राज्यकर्तानीच हि तत्व अक्षरशा पायदळी तुडवली त्याची किती उदाहरने देता येतील भ्रष्ट्राचार करणे, मतदारांना लाच देने, आंदोलन मोडुन काढने. हि तत्व गांधीवादात बसतात का ? 1लाख 76 कोटी रु . महा घोटाळा भारतात झाला, कोणाच्या कृपेने ? एकीकडे जनतेची प्रंचड लूट कारायची आणि दुसरी कडे त्याच जनतेसमोर मतांची भिक मागायची हा कुठला आला गांधीवाद !! गल्ली पासुन दिल्ली पर्यत सगळेच राजकारनी आणि राजकर्ते गांधीच्या नावाचा जय घोष करतात आणि एकीकडे लाचारी,लबाडी भ्रष्ट्राचार कृतघ्नता पाखंड याला उधान आसा उलटाच प्रवास गांधीवाद्याचा पाहायला मिळतो. सत्तेसाठी जनतेशी प्रातरणा हि तर रक्तातच आहे यांच्या, म्हणतात की राजकारनात आणी सत्तकारणात ला गांधीवाद लालबहादुर शास्री निधनानंतर संपला आणि ते खरेच आहे. कुठे ते आणी कुठे आजचे मंत्री...
हिदुस्थानात आज गांधीवाद कमी आणि त्याची मार्केटिंग जास्त सुरु हे गांधीशी काडीचा संबध नसलेला गावगुंड मुन्नाभाई आज गांधी टोपी घालून आज पंचायत निवडुकीत ऐटीत मते मागतो आहे तर कोणी गांधीटोपी घालुनच लाच घेतो आहे. किती भिषन घडतय हे. तो महात्मा बघत आसेल हे तर त्याच्या अत्म्याला किती वेदना होत आसतील हे देवच जानो....
गांधीवादा सारख्या विषयावर लिहिन्याची मुळीच हौस नव्हती पण आत्तच आण्णा हजारे यांच्या गांधीवादावर आक्षेप घेवुन गांधीवादी विचारांची जो अर्थ सांगीतला जातो तो या राजकारण्या आणी काँग्रेसवाल्यांकडुन पाळला जातोय का याचा विचार करायची वेळ आज आपल्या सगळ्यावर आली आहे. गांधीवाद फक्त तोँडात पोटात काही वेगळच आशी आजची परीस्थिती आहे साठ वर्ष फक्त फसणुक केली या गांधीवाद आणि काँग्रेसनी विकास काय शुन्य ?? देशात आत्यचार बलात्कार भष्ट्राचार गुन्हेगारी वाढतेय हे का थांबु शकत नाही गांधीवाद, निवडनुकी वेळी फक्त गांधीवाद आणि इतर वेळी कुठे जातो तुमचा हा गांधीवाद !!
आज देश कुठे चाललाय आण्णा सारखा चारित्र्यवान माणुस याच एक शब्द चुकीचा काय बोलला तर तो गांधीवादाच्या विरोधी किती दिवस झाले तो आहिंसेने सत्या साठी लोकपालची मागणी करतो त्याला गांधीवादाने उत्तर द्यायच सोडुन खोटी आश्वासने देता हाच गांधीच्या काँग्रेस चा गांधीवाद का ? गांधीवाद आम्हाला कधीच पटला नाही आणि पटनार देखील नाही त्याच विरोधच करु पण गांधीवाद्या कडुन गांधीवादाची जी विटंबना चाललेल ती पाहुन हसु ही अवरत नाही. असा गांधीवाद तुम्हालाच लखलाभो, गांधीवादाच सोंग घेवुन जनतेची बरीच फसवनुक तुम्ही केली पण आशा आहे जनता आता शहानी झाली असेल, तुमच्या ह्या सोँगाचा पडदा टरा टरा फाडुन वेशीवर टांगन्याच्या संधी वाट पाहत आहे, हे सगळं पाहतांना मनात सारखा एकच प्रश्न येतो "हा कसला गांधीवाद" ??

प्रशांत गडगे

Wednesday 7 December 2011

मुंबई सह संयुक्त महाराष्ट्र व्हाया आजची तरुणाई....

कालच आचार्य आत्रे रंगमदिरात गिरगाव व्हाया दादर नाटकाचा प्रयोग पाहिला, तसा संयुक्त महाराष्ट्राचा इतिहास वाचलाच आहे, पण वेळ होता अन् योगायोगानेच या नाटकाचा प्रयोग हि त्या मुळे हे शक्य झाल, एका सत्य घटनेवर आधारीत आणि वास्तवाशी संबध आसलेल्या या नाटकाला तशी तुरळकच गर्दी होती, आणि कोणताही धांगडधिंगा न करता शांततेत नाटक पाहत होती..
या नाटकाची संहिता तशी साधीच पण खुप काही सांगुन जानारी काल परवाच हि घटना घडुन गेली की, काय ? आशी जाणीव करुन देनारी.. अर्थात आज पन्नास वर्ष उलटली तरी जखम ही आजुन ओलीच आहे फक्त थोडी खपली धरली आहे. 105 हुत्म्याच्या बलिदाना नंतर मुंबई सह संयुक्त महाराष्ट्राची निर्मिती झाली, आचार्य आत्रे, एस् एम जोशी काँ डांगे आणि अनेकाच्या नेऋत्वाने सतत पाच वर्ष मोरारजी देसाई आणि नेहरु सारख्या लोकांशी संघर्ष करुन मिळवली आहे हि मुंबई...

नाटकाच्या शेवटच्या दृष्यात खुप भयान आणि वास्तवातला एक प्रसंग चितारला आहे मन हेलावनारा आणि डोळ्यात अश्रु येता येता एक सामाजिक बांधिलकीची जाण करुन देनारा. संयुक्त महाराष्ट्राच्या अंदोलनात हुतात्मा झालेल्याची एक विधवा फ्लोराफांऊट जवळ चळवळीच इतिहास आठवत आसते मध्येच एक 14 वर्षाचा मुलगा तिच्या कडे विस्मयाने बघुन तिचा तिरस्कार करुन निघुन जातो. प्रसंग संपतो...

पण प्रत्येक रसिकाला अंर्तमुख करुन जातो..

जी मुंबई महाराष्ट्रात आनन्या साठी ज्या ज्ञात अज्ञात हुतात्म्या नी आपल्या संसाराची राख रांगोळी केली, लाठ्या खाल्या काठ्या खाल्या वेळ आली तेव्हा बलिदान केले त्या हुतात्म्या बद्दल आजच्या या तरूणपीढी ला काहीच माहीती आज शंभर पैकी जेमतेम फक्त 20 तरुणांना या मुबई सह संयुक्त महाराष्ट्राची चळवळ माहीत आहे. कीती लज्जास्पद आहे... कारण हा इतिहास कधीच या पिढीला शिकवला गेला नाही सांगीतला गेला नाही.आजही मुंबईला बाँम्बे म्हणुन संबोधनारे कीती मराठी महाभाग मी याच महाराष्ट्रात पाहीले आहेत हेच याच एक ज्वलंत उदाहरण,जसा भारताच्या स्वंतंत्र्य लढ्याचा इतिहास आहे तसाच दुर्देवाने मराठी माणसाला महाराष्ट्रा सहित मुंबई , आम्हाला या दळभद्री कांग्रेस विरुध्द संघर्ष करुन घ्यावी लागली आहे. हा ही एक इतिहास आहे.. हा इतिहास आजच्या तरुणपीढी पर्यत पोचायलाच हवा कारण भविष्यात पुन्हा आसे कुटील डाव होनारच , आणि वेळी रक्तरंजीत इतिहास या पिढीला माहीतच नसेल तर आमची हि मुंबई हातची गेली म्हणुन समजा. हा इतिहास हस्तांतरीत करण्याचे काम आपल्या सगळ्यांच आहे, प्रत्येक मराठी मानसाला आभिमानाने जर मुंबईत राहायचं आसेल तर संयुक्त महाराष्ट्राची चळवळ प्रत्येक मराठी घरात घरात पोचलीच पाहीजे, जर हा इतिहास पोचलाच नाही आणी उद्या जर यदा कदाचीत मुंबई महाराष्ट्रतुन वेगळी झालीच तर आपल्या कर्माला दोष देत बसु नका !

मुंबई सह संयुक्त महाराष्ट्राचा लढा प्रत्येक मराठी तरुणा पर्यत पोहचलाच पाहीजेत यासाठी, भविष्यात मुंबई वेगळी करन्याचा प्रयत्न कोणी केलाच तर पुन्हा या क्रांती च्या मशाली सत्ताधार्याच्या घश्यात घालन्या साठी या पिढीला आत्ताच जागे केले पाहीजेत..
.
प्रशांत गडगे

Saturday 5 November 2011

तरुणांचा राजकारनातील सहभाग !!

सभोवताली जे घडताय ते अस्वस्थ करनारे आहे. देशाच्या अंर्तगत सुरक्षे बरोबर देशात सर्वत्र वाढलेली बेकारी महागाई आणि सरकारी भ्रष्ट्राचार या चारही बाजुनी सरकार चांगलेच आडचनीत आले आहे. भ्रष्ट्राचार विरोधी जनलोकपाल आसो किंवा स्विस बँकेतील काळा पैसा आसो सगळ्याच बाबतीत सरकार चांगलेच आडचनीत आले आहे. आणि या चार सहा महिन्यांत घडलेल्या घटनांवरुन एक गोष्ट लक्षात येते,आज काल चे युवक मोठ्या प्रमाणात अंदोलना मध्ये सहभाग नोंदवत आहेत आणि हिच या नव्या पिढीच्या राजकारण प्रवेशाची नांदी ठरली !!

आज आपला देश स्वंतत्र्य होउन सत्तर वर्ष झाली तरी ही देशासमोरची आव्हाने तिच आहेत .आजही इथली सामान्य जनता अन्न वस्र आणि निवारा याच्याच शोधात फिरत आहे. आश्या वेळी संतप्त होउन सरकारला एकच प्रश्न विचारावासा वाटतो की गेली सत्तर वर्ष हे सरकार काय फक्त झोपा काढतय का ??जनतेचे सोडा पण या सत्तर वर्षात सरकारी आधिकारी आणि मंत्री यांची बरीच प्रगती झाली आहे . उदा. ए राजा कनीमोळी कलमाडी, आशी मोठी यादीच आहे . या सारखे भ्रष्ट्र नेते करोडो रुपयांचे गफले करुन तुरुंगाची हवा खात आहेत.आणि आमची सर्व सामान्य गरीब जनता हे सगळं हाताश पणे पाहत आहे , सरकार कारवाई च्या नावावर "मी मारल्या सारख करतो तु रडल्या सारख कर " आसा खोटा नाटक करुन जनतेची दिशाभुल करीत आहे . हे आम्हाला कळतं नाही का ?

आपल्या देशाची लोकसंख्या आज आब्जावर पोहचली आहे आणि हे सरकार म्हणजे मंत्री आणि सरकारी आधिकारी हे मुठभर लोक गेली सत्तर वर्ष फक्त आम्हाला राबवतात हे आमच्या लक्षात तरी कसं येत नाही. गेल्या काही वर्ष फक्त विकासाच्या बाता मारायच्या पण विकास कुठे झालाय हे सांगु शकतात का ? देशाच्या एकुन उपन्ना पैकी 75% पैसा हा मंत्री आधीकारी यांच्यावर खर्च केला जातो मग कसा होनार विकास ?? देशाची जनता महागाई आणि भ्रष्ट्राचाराला अक्षरशः वैतागली आहे . इथे रेशन पासुन ते मंत्रालया पर्यत चिरीमिरी दिल्या शिवाय कामे पुर्ण होत नाही आणि माहागाईच कार काय सांगु नका. या सरकारच्या स्थापने पासुन ती वर्षात दुप्पट झाली आहे आणि पाच वर्षात नक्कीच चौपट होईल याची भिती वाटते. पेट्रोल डिझेल आन्न धान्य या सारख्या गोष्टी सर्व सामान्याच्या आवाक्या बाहेर चालल्या आहेत सर्वत्र आराजकता माजली आहे आणि झोपेचे सोंग घेवुन सुस्त पडल आहे . या वरुन कळते या सरकारचा माज कीती वाढलाय ते. आणि येवढ्या मुजोर सरकारला आपन आब्जावधी भारतीय मिळुन ही काही करु शकत नाही याची खंत वाटते, येवढे षंढ आहोत का आपण ?

जे घडतंय ते विपरीत आणि विचलीत करणारे आहे पण हि परिस्थिती बदलायला हवी. इथला तरुन जागा झाला तर ते नक्कीच शक्य आहे आन्यथा येत्या काळात अपल्या देशाच काही खर नाही आस म्हणन्याची वेळ दुर्देवाने आमच्या वर येईल, संसंदे पासुन तर ग्रा.पं पर्यत सर्वत्र परिस्थिती सारखी निवडनुका आल्या का मोठ मोठी आश्वासने द्याचची आणि सत्तेवर यायचे ,मिळालेल्या सत्तेचा दुरुपयोग करुन प्रचंड पैसा कमवायचा आणि पुन्हा निवडुकीत हाच पैसा वापरायचा हे गणितच ठरलंय . आता किती दिवस हे डोळ्या समोर घडत आसतांना पाहत बसायच आम्ही, आणि आता प्रत्येक युवकाने राजकारन यायलाच हवे किंबहुना तशी वेळ सरकारने आता काढली आहे .

इंटरनेट आणि प्रसिध्दी माध्यमाच्या जगात मोठ मोठी आंदोलने झाली या इजिप्त सारख्या देशात तरुनांनी एकत्र येवुन जुलमी राजवटीचा नाश केला तर हे कोण ? आणी भारतात हे आशक्य आहे का ? क्रांतीकारकांचा देश म्हणुन भारताची ओळख आहे आणि जगातील सगळ्यात जास्त तरुन आसलेला देश म्हणुन भारत जग विख्यात आहे. आशा देशात एक नवी क्रांती होने मुळीच अशक्य नाही. या देशातील सगळ्यांच तरुनांनी एकत्र येवुन नुसती फुक जरी मारली तरी सरकारची पळता भुयी थोडी होईल येवढी प्रचंड ताकद आजच्या युवापिढी मध्ये आहे . भष्ट्राचार आणि महागाई विरोधात सगळ्यांनी एकत्र येवुन लढने आज गरजेचे आहे. सभोवताली घडनार्या घटना पाहता या देशाला फक्त युवाच तारु शकतात आसा विश्वास वाटतो देशातील तरूनांनी राजकारना बाबत उदासीन न राहता राजकारनात सक्रीय होने गरजेचे आहे. कारण राजकारणी हे कधीच सर्वभौम नसतात ते जनमतावर आवलंबुन आसतात आणि याच जनमताच्या प्रंचड ताकदीवर आपण त्यांना मुठीत घेवुन राबवु शकतो पण या साठी मोठे संघटन घडने अवश्यक आहे आणि हे संघटन या देशातील युवकच उभे करतील आसा विश्वास वाटतो.

Tuesday 25 October 2011

देशभक्ती आणि आहिंसा ???

काल परवाच प्रशांत भुषन ला काही हिंदुत्ववादी तरुणांनी कोर्टातील त्यांच्या कार्यालयात घुसुन चोप चोपला जेव्हा हि बातमी कळाली तेव्हा वाटलं की काँग्रेस चे कोणी कार्यकर्ते आसतील. पण ज्या वेळी प्रशांत भुषन ने केलेली बेताल विधाने ऐकली तेव्हा तळपायाची आग मस्तकात गेली. कोण हा प्रशांत भुषन आणि त्याला पाकिस्थान चा ऐवढा पुळका का येतो ? आणि हि विधाने करताना आश्या काही तोर्यात बोलत होता की काश्मिर याच्या बापाचाच आहे का ?
ज्याने फाळणी अनुभवले किंवा फाळनी बद्दल काही वाचल आहे ,त्यालाच कळेळ देशाची फाळनी किती दुर्देवी आसते,अनेक क्रांतीकारच्या बलीदान नंतर हा देश सुमारे दिडशे वर्षाच्या गुलामगीरीतुन मूक्त झाला पण फक्त एका फाळणीनेच या देशातील हजारो हिंदु मुस्लीमांची कत्तल झाली. ज्या अहिंसेच्या पुजार्याने ह्या फाळनीला मान्यता दिली त्याच्यामुळेच या देशात हिंसेचा आगडोंब उसळला तो आजुनही शांत होत नाही .जी फाळनी व्हायला नको होती ती झाली आणि आता पुन्हा परत त्याची पुनरावृत्ती कशा साठी ?
.
प्रशांत भुषन सारखा एक विधीतज्ञ आणि जबाबदार माणसाच्या मेंदुत ऐवढेसडके विचार आसतील तर का नाही या देशातल्या तरुनांची माथी भडकनार!!आणि आशा वेळी भडकायलाच पाहीजेत, ज्या देशाच मिठ खायच आणि त्याच देशाचे तुकडे पाडायचे कुठली आली हीनिती. आधिच या देशात भ्रष्ट्राचार महागाई बेरोजगारी वाढली आहे त्या काँग्रेस सरकारनी तर निचपणाचा तर कळस गाठला आहे. त्यात आण्णा सारख्यासाध्या माणसाने भ्रष्ट्राचारा विरुध्द रनशिंग फुकले आणि देशाच्यातरुणांनी हि आक्षरशा डोक्यावर घेतले त्या मागे अण्णाचे स्वच्छ चारित्र्य आणि विचारसारनी मोठा हात आहे. पण म्हणतात ना वाघाच कातड घालुन गाढव कधी वाघ होत नसतो तसाच प्रकार प्रशांत भुषनने केला आणि याच देशातल्या तरुनांनी त्याला आक्षरशा पायदळी तुडवलाच नाही तर ढुंगनावर लाथा टाकुन सरळ हि केला. त्याच्या या विधानाला जरी काही काही विषेश महत्व जरी नसल तरी आशा प्रवृत्ती या देशातुन समुळ नाश करन्या साठी किवां या प्रवृत्तीना धडा शिकवन्या साठी ज्या धाडसी हिंदुत्ववादी तरुणांनी जो काही पराक्रम केला त्याचे त्रिवार आभिनंदन !!
आणि या पुढे हा देश तोडन्याची कोणी भाषा करत आसेल तर त्याला याच मातीत गाडायला इथले तरुण सक्षम आहेत यात शंका नाही !!
स्वं.सावरकर भगतसिंग यांनी आम्हालाफक्त देशभक्ती शिकवली आहे आहिंसा नव्हे !!
~प्रशांत

Friday 14 October 2011

!! खड्यात गेली लोकशाही !!



जिवनं महाग आणि मृत्यु स्वस्त आहे ,
रोजी रोटी साठी धडपनार्या
सामन्यच त्यांच लक्ष्य आहे...

कुठुन येतात? कुठे जातात?
कुणाला काही माहित नाही,
त्यांनी सांडवलेल निष्पाप रक्त आता आम्हाला पाहवत नाही.....

खुप सहन केल अजुन ही करतो आहे , 
इंडीया स्पीरीट च्या नावाने अजुनही जगतो आहे....

कसलं आल स्पीरीट अन् कसलं काय?
खरचं हतबलते पुढे आम्ही लाचार 
अन् काय ?

रोज आमचं बेभरश्याच राहटगाड,
सरकारी भरश्यावर लोटतो आहोत,
आज नाही तर उद्या मरण येनारच याच भरवश्यावर जगतो आहोत..... 

सरकारच्या कृपेने 
सगळ काही भोगतो आहोत ,
लोकशाहीचा टेँभा जगात मिरवीत आहोत....

खड्यात गेली ती लोकशाही
अन् खड्यात गेलं सरकार
आमच्या रक्षणा साठी आता अम्हीच होवु तयार !!

~प्रशांत

!! आता सिमोल्लंघन झालेच पाहीजेत !!


सालाबाद प्रमाणे यावर्षी पण विजयादशमी आली. बाँम्बस्फोटान बरोबरच माहागाई वाढत असतांनाही आम्ही आगदी धडाक्यात दसरा दिवाळी साजरी करतोय. कारण सरकारी अहवाला नुसार 32 रु पेक्षा कित्तेक पटीने जास्त रुपये दर महीन्याला खर्च करतोय ?? जरी आज 32 रु. एक वेळच पोटभर अन्न जरी येत नसल तरी सरकारने दिलेली झुल आम्ही आगदी अवाक्षर हि न बोलता घेवुन मिरवतो आहो. किंबहुना दहशदवाद ,महागाई घोटाळे नितीमत्ता सगळ्याच गोष्टी वर सरकार आपयशी आसतांना देखील, आम्ही आमच्या सरकारचे गोडवे ईमाने ईतबारे गातोच आहोत. का तर मेरा देश महान ? पण मला नेहमी एकच प्रश्न पडतो ज्या सकारच्या काळात मोठ मोठे घोटाळे होतात, बाँम्बस्फोट होतात, माहागाईने जनता त्रस्त आहे .आश्या सरकारच्या सत्तेत देश महान कसा आसु शकतो. सरकार बेईमान आणि देश महान कस शक्य आहे. 

गरीबाला जिथे दोन वेळ आन्न मिळवन कठीन आहे तिथे सन साजरे कसे होऊ शकतात ? सरकार आज सगळ्याच परिस्थीतीवर मात करण्यात आपयशी ठरले आहे. भ्रष्ट्राचार आणि महागाईचा काळा राक्षस तुमच्या आमच्या मानगुटीवर बसला आहे. दहशदवाद नाक्या नाक्या वर दबा धरुन बसला आहे. कधी आपला घात होईल याची शाश्वती नाही.आशा वेळी आम्ही आमचे सन उत्सव आंनंदात कसे साजरे करु शकतो ? 

आमच्या हिदु धर्मात विजायदशमी ला आन्यन्य साधारन महत्व आहे याच दिवशी रामायनात प्रभु रामचंद्रानी दृष्ट्र रावनाचा वध केला .याच दिवशी आदिशक्ती आंबे मातेने ने महिषासुर या राक्षसाचा वध करुन दृष्ट्र शक्तीचा पुर्ण पराभव केला होता आणि याच दिवशी पांडवानी आज्ञातवास सोडुन कौरवांन विरोधी युध्दा साठी सिमोल्लंघन केले. हाच तो विजयादशमी चा दिवस !! 

सभोवताली सर्व विपरीत घडत आसतांना विजयादशमी चा फक्त एकमेंकाना आंनदाने शुभेच्छा देन्या पेक्षा या दिवसाचे खरे स्वरुप जाणून आता सरकार विरोधात आर्थात महागाई भ्रष्ट्राचार घोटाळे दहशदवादाला पोसनार्या सरकारचे पूर्ण दहन केल्या शिवाय खर्या अर्थने या देशात विजयादशमी साजरी होऊ कशी होऊ शकते !! 

आता सिमोल्लंघन व्हायलाच हवे.. हि तूमची माझी आणि येनार्या पिढीची गरज आहे !!

लोकल ते ग्लोबल दहिहंडी..

लहानपणी साजरे केलेले सनवार आता आठवले की मला मोठी गंमतच वाटते. त्यावेळी शाळेचा अभ्यास तसा थोडाच कमीच आसायचा आणि हल्लीच्या ट्युशनच तेव्हा फँड ...